शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rain | अवकाळीने पावसामुळे पुणे जिल्ह्यातील ४७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 19:05 IST

या अवकाळी पावसामुळे १ हजार २२१ शेतकऱ्यांना फटका बसला...

पुणे : अवकाळीने जिल्ह्यातील १३ पैकी ७ तालुक्यांतील ४३ गावांमधील ४७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात १०२ हेक्टरवरील फळपिके, ३७५ हेक्टरवरील बागायती तर जिरायती पिकांखालील १.२ हेक्टरवरील नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तयार केला आहे. या अवकाळी पावसामुळे १ हजार २२१ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

पुणे जिल्ह्यात गुरुवार ते शनिवारी पडलेल्या पावसामुळे ४३ गावांमधील ४७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान आंबेगाव  तालुक्यात  झाले असून त्यात बागायती क्षेत्राचेच नुकसान झाले आहे. हे क्षेत्र २५२.७० हेक्टर इतके आहे. शनिवारी दुपारपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागातींल तालुक्यांत विशेषकरून जुन्नर व आंबेगाव तालुक्यांत  वादळ, वारे, गारपीटसह पाऊस पडला. बागायती पिकांना मोठी झळ पोचली. आंबे गळून पडले तर द्राक्षाच्या घडात पाणी शिरल्याने नुकसान पोहोचले. गहू, ज्वारी भिजून गेली व कडबा काळा पडला. पपई, चिक्कू, पेरुचे नुकसान झाले. कांद्याचा रेंदा झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. 

जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी ७ तालुक्यांत पिकांचे नुकसान झाले आहे. आंबेगावनंतर जुन्नर तालुक्यात नुकसान झाले असून येथील कांदा, भाजीपाला, गहू, द्राक्ष  पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात बागायती क्षेत्र ७६ हेक्टर असून फळपिकांखालील ९८ हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. पुंरदर तालुक्यातील गहू व कलिंगडाचे नुकसान झाले असून नुकसानीचे क्षेत्र २३.५० हेक्टर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर शिरूर तालुक्यात १८, मुळशी तालुक्यात ५.५०, हवेलीत ३.२० व मावळ तालुक्यात १.२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

तालुकानिहाय शेतकरीपुरंदर ७५, जुन्नर ३१३, शिरूर २५, आंबेगाव ७३०, हवेली ४२, मावळ १०, मुळशी २६ एकूण १२२६गावांची संख्या पुंरदर ७, जुन्नर ८, शिरूर १, आंबेगाव ५, हवेली २, मावळ १, मुळशी १९ एकूण ४३

अवकाळी पाऊस व गारा पडल्याने रब्बी हंगामातील व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार गुरुवार, शुक्रवार व शनिवारी पडलेला पाऊस हानीकारक ठरला आहे. ज्यांनी रब्बी हंगामातील पीकांचा विमा भरला आहे त्यांनी विमा कंपनीकडे पीक नुकसानीबाबत तक्रार ( इंटीमेशन) नोंदवावी. कृषी सेवकांकडून पंचनामे करण्याचे काम सुरू होते. आता कर्मचाऱ्यांचा संप महसूल व कृषी विभाग एकत्रित पंचनामे वेगाने करतील.- सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस