शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

Pune Rain | अवकाळीने पावसामुळे पुणे जिल्ह्यातील ४७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 19:05 IST

या अवकाळी पावसामुळे १ हजार २२१ शेतकऱ्यांना फटका बसला...

पुणे : अवकाळीने जिल्ह्यातील १३ पैकी ७ तालुक्यांतील ४३ गावांमधील ४७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात १०२ हेक्टरवरील फळपिके, ३७५ हेक्टरवरील बागायती तर जिरायती पिकांखालील १.२ हेक्टरवरील नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तयार केला आहे. या अवकाळी पावसामुळे १ हजार २२१ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

पुणे जिल्ह्यात गुरुवार ते शनिवारी पडलेल्या पावसामुळे ४३ गावांमधील ४७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान आंबेगाव  तालुक्यात  झाले असून त्यात बागायती क्षेत्राचेच नुकसान झाले आहे. हे क्षेत्र २५२.७० हेक्टर इतके आहे. शनिवारी दुपारपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागातींल तालुक्यांत विशेषकरून जुन्नर व आंबेगाव तालुक्यांत  वादळ, वारे, गारपीटसह पाऊस पडला. बागायती पिकांना मोठी झळ पोचली. आंबे गळून पडले तर द्राक्षाच्या घडात पाणी शिरल्याने नुकसान पोहोचले. गहू, ज्वारी भिजून गेली व कडबा काळा पडला. पपई, चिक्कू, पेरुचे नुकसान झाले. कांद्याचा रेंदा झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. 

जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी ७ तालुक्यांत पिकांचे नुकसान झाले आहे. आंबेगावनंतर जुन्नर तालुक्यात नुकसान झाले असून येथील कांदा, भाजीपाला, गहू, द्राक्ष  पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात बागायती क्षेत्र ७६ हेक्टर असून फळपिकांखालील ९८ हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. पुंरदर तालुक्यातील गहू व कलिंगडाचे नुकसान झाले असून नुकसानीचे क्षेत्र २३.५० हेक्टर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर शिरूर तालुक्यात १८, मुळशी तालुक्यात ५.५०, हवेलीत ३.२० व मावळ तालुक्यात १.२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

तालुकानिहाय शेतकरीपुरंदर ७५, जुन्नर ३१३, शिरूर २५, आंबेगाव ७३०, हवेली ४२, मावळ १०, मुळशी २६ एकूण १२२६गावांची संख्या पुंरदर ७, जुन्नर ८, शिरूर १, आंबेगाव ५, हवेली २, मावळ १, मुळशी १९ एकूण ४३

अवकाळी पाऊस व गारा पडल्याने रब्बी हंगामातील व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार गुरुवार, शुक्रवार व शनिवारी पडलेला पाऊस हानीकारक ठरला आहे. ज्यांनी रब्बी हंगामातील पीकांचा विमा भरला आहे त्यांनी विमा कंपनीकडे पीक नुकसानीबाबत तक्रार ( इंटीमेशन) नोंदवावी. कृषी सेवकांकडून पंचनामे करण्याचे काम सुरू होते. आता कर्मचाऱ्यांचा संप महसूल व कृषी विभाग एकत्रित पंचनामे वेगाने करतील.- सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस