शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

Dada Bhuse: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पैसे मिळायलाच हवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 15:43 IST

राज्यात ३४ लाख ५२ हजार शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना प्राप्त झाल्या असून त्यातील फक्त १० लाख शेतकऱ्यांचे पंचनामे आतापर्यंत पुर्ण झाले आहेत.

ठळक मुद्देकृषीमंत्र्यांची विमा कंपन्यांना तंबी : छाननी संख्या वाढवण्याचा आदेश

पुणे : अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पैसे मिळायलाच हवेत अशी तंबी कृषी मंत्री दादा भूसे यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेतंर्गत राज्यात काम करणाऱ्या ६ कंपन्यांच्या प्रतिनिधींना मंगळवारी झालेल्या बैठकीत दिली. राज्यात ३४ लाख ५२ हजार शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना प्राप्त झाल्या असून त्यातील फक्त १० लाख शेतकऱ्यांचे पंचनामे आतापर्यंत पुर्ण झाले आहेत.

मंगळवारी रात्री उशीरापर्यंत झालेल्या या बैठकीत कृषी मंत्री भूसे तसेच कृषी सचिव एकनाथ डवले ऑनलाईन सहभागी झाले होते. कृषी आयुक्त धीरजकुमार, सांख्यिकी विभागप्रमुख विनयकुमार आवटे तसेच राज्यात काम करणाऱ्या सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. जूलै ते सप्टेबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पिक विमा योजनेत राज्यातील ८४ लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३३ लाख ५२ हजार जणांनी नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्यांकडे दावा दाखल केला आहे. त्यातील १० लाख जणांच्या नुकसानीचे अधिकृत पंचनामे झाले आहेत.

मंत्री भूसे यांनी सर्व माहिती घेतल्यानंतर विमा कंपन्यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने ९७३ कोटी रूपये हप्ता दिला. केंद्र सरकारने ८९३ कोटी रूपये जमा केले. शेतकऱ्यांचेही २ टक्के प्रमाणे काही कोटी रूपये जमा झालेत. असे असताना कंपन्यांकडून किरकोळ कारणे, जूजबू कागदपत्रे यावरून शेतकऱ्यांचे दावे नाकारले जातात. ते काही फसवायचे म्हणून दावा दाखल करत नाहीत तर नुकसान झाले म्हणून करतात. त्यामुळे त्यांच्याकडे सहानुभूतीने पहा व दावे मंजूर करा, दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतील असे पहा, त्यासाठी कर्मचारी वाढवावे लागतील तर वाढवा असे मंत्री भूसे यांनी बैठकीत उपस्थित विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना ठणकावून सांगितले.

आयुक्त धीरजकूमार यांनी राज्याची माहिती दिली. आवटे यांनी जिल्हानिहाय आकडेवारी सादर केली. ३४ लाख ५२ हजार पूर्वसूचना प्राप्त झाल्या असून १० लाख शेतकऱ्यांचे पंचनामे पुर्ण झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. पंचनामे होताना महसूल, कृषी तसेच विमा कंपनी यांचे प्रतिनिधी उपस्थित असणे गरजेचे असते. तांत्रिक बाबीत अडकून पडू नये, आपत्तीक्षेत्र मोठे असेल तर सामूहिक पंचनामे करून दावा प्रकरणे तयार करावीत अशी सूचना मंत्री भूसे यांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकारagricultureशेती