शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Harshvardhan Patil: कर्मयोगी साखर कारखाना ऊसास प्रतिटन २५०० पेक्षा अधिक दर देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 17:35 IST

साखर कारखानदारी अडचणीत असून भविष्यात चांगले दिवस येणार आहेत

कळस : इंदापुर येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यास (Sugar Factory) ऊस गाळपास देऊन शेतकर्‍यांनी सहकार्य करावे. यावर्षी गाळप होणार्‍या ऊसास प्रतिटन २५०० प्लस दर देण्यात येईल अशी घोषणा माजी मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केली. इंदापुर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते 

पाटील म्हणाले, साखर कारखानदारी अडचणीत असून भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. गेल्या वर्षीच्या हंगामातील काही रक्कम देण्याची राहीली आहे. मात्र गेल्या हंगामात २१० कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात आली आहेत. उर्वरीत दहा पंधरा कोटीची रक्कम ही लवकरच देण्याचे नियोजन केले आहे. यावर्षीच्या गाळप होणार्‍या ऊसास प्रतिटन २५०० प्लस दर दिला जाईल. याबाबत नियोजन करण्यात आले आहे. 

काही मंडळीकडून कारखान्याच्या बाबत चुकीचा अपप्रचार 

''काही मंडळी कारखान्याच्या बाबत चुकीचा अपप्रचार करतात. मात्र ज्या संस्थेने हजारो कोटी सभासदांना दिले. त्या संस्थेत कोणाचेही देणे राहणार नाही. एक लाख टन ऊस बाहेर गेला. तरी १० कोटी रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे ऊस देऊन सहकार्य करावे सर्व ऊस गाळपास दिला पाहिजे. अधिक गाळप झाल्यास अधिक दर देण्यास मदत होते. त्यामुळे सभासद शेतकर्‍यांनी ही बाब विचारात घेतली पाहिजे. कारखान्यास ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे. त्यामुळे कारखाना अडचणीतून बाहेर येण्यास मदत असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.'' 

यावेळी तालुकाध्यक्ष शरद जामदार, शहराध्यक्ष शकिल सय्यद, माऊली चवरे, मारुती वणवे उपस्थित होते. 

टॅग्स :Indapurइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी