शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

समिक्षकांनी आण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची दखल घेतली नाही : डाॅ. श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 4:39 PM

आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात श्रीपाल सबनिस यांनी आण्णाभाऊ साठेंवर आपले विचार व्यक्त केले.

पुणे : आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारीत 12 चित्रपट तयार झाले. ए.के. हनगल, बलराज सहानीं सारखे हिंदीचित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार आण्णाभाऊंच्या साहित्य प्रेमात होते. पंरतु मराठी साहित्याची समीक्षा करणाऱ्या समिक्षकांनी आण्णाभाऊंच्या साहित्याची दखल आण्णाभाऊ असताना घेतली नाही असा खेद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला. 

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या संघठनेतर्फे देशात धर्म जाती भेदाच्या ताणतणावात अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य मानवतचा दिपस्तंभ या विषयावर महाचर्चाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सबनीसांनी हे विचार मांडले.

सबनिस म्हणाले, वाटेगाव सारख्या गावांतून मुंबईत आलेल्या आण्णाभाऊंना प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागले. रोजच्या जगण्याच्या लढाईत आण्णाभाऊंनी कष्टप्रद कामे केली. ही कामे करीत असताना कधी घाटकोपर तर कधी चेंबुर झोपडपट्टीत ते राहत होते. ही सर्व कष्टाची काम अण्णाभाऊंनी केल्याने श्रमीक, वंचित, शोषीत हा त्यांच्या विचारांचा गाभा राहिला. त्या सर्व श्रमिकांच्या हुंकार म्हणजे आण्णाभाऊंचे साहित्य होय. माकर्सवादाचा झेंडा हाती घेतल्यानंतर जातीं-पातींच्या सर्व सिमारेषा आण्णाभाऊंनी ओलांडल्या. त्यांच्या कथा, कांदबऱ्या, कवी, वगनाट्य, पोवाडे आदी साहित्य प्रकारातूंन त्यांनी सकारात्मक नायक आणि नायीका सादर केली. त्यांच्या शब्दातील ताकदीमुळे उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे रहायचे तर अन्यायग्रस्त, पिढीत शोषीतांचे रक्त खवळून उठायचे. अण्णाभाऊंनी गवाणकर, शाहीर अमर शेख यांच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्र, गोवा मुक्ती संग्रमात झोकुन देऊन ढोलकी आणि ढफीच्या थापावर संग्राम उभा केला. अण्णाभाऊंचे कार्यकर्तृत्व केवळ एका जाती पुरता मर्यादीत नाही. त्यांनी रशियापासून भारतातील आदीवासी भागापर्यंत मजल मारलेली दिसून येते. त्यांचे लाल बावटा पथकाने तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. चाॅंदबिबि सारख्या मुस्लिम महिलेने त्यांना मुंबईत राहण्यासाठी जागा दिली. आण्णा भाऊंनी सुमारे 35 कादंबऱ्या लिहिल्या. 

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसPuneपुणेcultureसांस्कृतिक