शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

शरद पवारांचा अनादर म्हणून नाही तर आदर ठेऊनच टीका करतो - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 22:58 IST

पवार यांचे आपत्ती व्यवस्थापन उत्तम आहे.  पण सध्या या व्यवस्थापनाबाबत ते राज्य सरकारला मार्गदर्शन करताना दिसत नाहीत किंबहुना त्यांनी या सरकारमधील इतरांच्या व्यवस्थापनाला संधी दिली असेल.

पुणे : शरद पवार यांचे कार्य मोठे आहे, त्यांचे आपत्ती व्यवस्थापन देशाने पाहिले आहे. आम्ही विरोधक असलो तरी त्यांच्यावर टीका करतो ते त्यांचा अनादर म्हणून नाही तर आदर ठेऊनच करतो. त्यांचा कामाचा वेग भरपूर आहे. या वयातही ते कोकणात गेले परंतु अजित पवार किंवा जयत पाटील गेले का? असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. 

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते़ ते म्हणाले, पवार यांचे आपत्ती व्यवस्थापन उत्तम आहे.  पण सध्या या व्यवस्थापनाबाबत ते राज्य सरकारला मार्गदर्शन करताना दिसत नाहीत किंबहुना त्यांनी या सरकारमधील इतरांच्या व्यवस्थापनाला संधी दिली असेल. शरद पवार हे थेट कोकणात गेले, दोन दिवस तेथे राहिले यात त्यांना मानलंच पाहिजे असे सांगून पाटील यांनी, पवार दोन दिवस राहिले पण राज्याचे मुख्यमंत्री केवळ पहिल्या दिवशीच काही तासंच एका ठिकाणी जाऊन आल्याचे  ते म्हणाले. कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ निसर्ग वादळ येऊन आज दहा दिवस उलटले तरी, त्यांना अद्याप एक रूपयांची मदत मिळालेली नाही़ त्यामुळे महापुराच्यावेळी जशी मदत आम्ही दिली तशी, किमान दहा-पंधरा हजार रूपयांची आर्थिक मदत या सरकारने प्रत्येक बाधिताला लागलीच द्यावी़ तसेच किमान दोन महिन्यांचा किराणाही त्यांना द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली़ दरम्यान तुम्ही काही करणार नाही व विरोधी पक्षाने मागणी केल्यावर आम्हीच राजकारण करतो ही ओरड योग्य नसल्याचेही ते म्हणाले़ 

कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे़ त्यातच निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठे नुकसान झाले आहे तरीही राज्य सरकार काहीही हालचाल करीत नाही़  हे सरकार गोंधळलेलं व लेचपेचं असल्यानेच कोणताही ठोस निर्णय त्यांच्याकडून होत नाही़ राज्यातील परिस्थिती हाताळण्यास हे सरकार अपयशी ठरले असून, गोंधळलेल्या या सरकारमध्ये कोणी निर्णय करायचे, कसे निर्णय घ्यायचे या सर्वच बाबींमध्ये गोंधळ आहे़ परिणामी कशाचाच निर्णय होत नसून त्याचा जनतेला त्रास होत आहे. १५ जून पासून शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत ठोस निर्णय नाही, अंतिम वषार्ची परीक्षा घेण्याबाबत एकमत होत नाही़ उद्योग-धंद्याबाबत निर्णय नाही़ काही ठिकाणी उद्योग-धंदे सुरू झाले पण त्यासाठी कुठलाही समन्वय नाही असे सांगून त्यांनी, सांगली जिल्ह्यातील उद्योगांमध्ये काम करणाºया कामगारांना जिल्हाबंदी असल्याने अनेक अडचणी येत असल्याचे उदाहरण दिले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारState Governmentराज्य सरकार