शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांचा अनादर म्हणून नाही तर आदर ठेऊनच टीका करतो - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 22:58 IST

पवार यांचे आपत्ती व्यवस्थापन उत्तम आहे.  पण सध्या या व्यवस्थापनाबाबत ते राज्य सरकारला मार्गदर्शन करताना दिसत नाहीत किंबहुना त्यांनी या सरकारमधील इतरांच्या व्यवस्थापनाला संधी दिली असेल.

पुणे : शरद पवार यांचे कार्य मोठे आहे, त्यांचे आपत्ती व्यवस्थापन देशाने पाहिले आहे. आम्ही विरोधक असलो तरी त्यांच्यावर टीका करतो ते त्यांचा अनादर म्हणून नाही तर आदर ठेऊनच करतो. त्यांचा कामाचा वेग भरपूर आहे. या वयातही ते कोकणात गेले परंतु अजित पवार किंवा जयत पाटील गेले का? असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. 

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते़ ते म्हणाले, पवार यांचे आपत्ती व्यवस्थापन उत्तम आहे.  पण सध्या या व्यवस्थापनाबाबत ते राज्य सरकारला मार्गदर्शन करताना दिसत नाहीत किंबहुना त्यांनी या सरकारमधील इतरांच्या व्यवस्थापनाला संधी दिली असेल. शरद पवार हे थेट कोकणात गेले, दोन दिवस तेथे राहिले यात त्यांना मानलंच पाहिजे असे सांगून पाटील यांनी, पवार दोन दिवस राहिले पण राज्याचे मुख्यमंत्री केवळ पहिल्या दिवशीच काही तासंच एका ठिकाणी जाऊन आल्याचे  ते म्हणाले. कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ निसर्ग वादळ येऊन आज दहा दिवस उलटले तरी, त्यांना अद्याप एक रूपयांची मदत मिळालेली नाही़ त्यामुळे महापुराच्यावेळी जशी मदत आम्ही दिली तशी, किमान दहा-पंधरा हजार रूपयांची आर्थिक मदत या सरकारने प्रत्येक बाधिताला लागलीच द्यावी़ तसेच किमान दोन महिन्यांचा किराणाही त्यांना द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली़ दरम्यान तुम्ही काही करणार नाही व विरोधी पक्षाने मागणी केल्यावर आम्हीच राजकारण करतो ही ओरड योग्य नसल्याचेही ते म्हणाले़ 

कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे़ त्यातच निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठे नुकसान झाले आहे तरीही राज्य सरकार काहीही हालचाल करीत नाही़  हे सरकार गोंधळलेलं व लेचपेचं असल्यानेच कोणताही ठोस निर्णय त्यांच्याकडून होत नाही़ राज्यातील परिस्थिती हाताळण्यास हे सरकार अपयशी ठरले असून, गोंधळलेल्या या सरकारमध्ये कोणी निर्णय करायचे, कसे निर्णय घ्यायचे या सर्वच बाबींमध्ये गोंधळ आहे़ परिणामी कशाचाच निर्णय होत नसून त्याचा जनतेला त्रास होत आहे. १५ जून पासून शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत ठोस निर्णय नाही, अंतिम वषार्ची परीक्षा घेण्याबाबत एकमत होत नाही़ उद्योग-धंद्याबाबत निर्णय नाही़ काही ठिकाणी उद्योग-धंदे सुरू झाले पण त्यासाठी कुठलाही समन्वय नाही असे सांगून त्यांनी, सांगली जिल्ह्यातील उद्योगांमध्ये काम करणाºया कामगारांना जिल्हाबंदी असल्याने अनेक अडचणी येत असल्याचे उदाहरण दिले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारState Governmentराज्य सरकार