पाणीकपातीचे पुण्यावर संकट

By Admin | Updated: August 18, 2015 23:52 IST2015-08-18T23:52:45+5:302015-08-18T23:52:45+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्म्यावरच असल्याने पुणे शहरामध्ये वर्षभर पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला

Crisis on watercourse in Pune | पाणीकपातीचे पुण्यावर संकट

पाणीकपातीचे पुण्यावर संकट

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्म्यावरच असल्याने पुणे शहरामध्ये वर्षभर पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पाण्याबाबतची परिस्थिती पालकमंत्री गिरीष बापट यांच्या निर्दशनास आणून दिली असून येत्या शनिवारी, २२ आॅगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
आॅगस्ट अर्धा संपल्यानंतरही अद्याप पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठयाची परिस्थिती गंभीर बनली आहे. जिल्हयामध्ये सरासरीच्या ६० ते ७० टक्के इतकाच पाऊस आतापर्यंत पडला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे पानशेत धरण ६४ टक्के, वरसगाव ४८ टक्के, टेमघर ४१ टक्के तर खडकवासला २७ टक्के भरलेले आहे. वस्तुत: आॅगस्ट मध्यावर ही धरणे १०० टक्क्यांपर्यंत भरलेली असतात. त्यामुळे पाणीकपात करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
खडकवासला प्रकल्प सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शहराला किती पाणी द्यायचे याचा निर्णय घेतला जातो, येत्या २२ आॅगस्ट रोजी या समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Crisis on watercourse in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.