शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

NDA Chowk: गाेंधळाचा महामार्ग! रस्ते आठ, जायचं कसं? एनडीए चौक परिसरातील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 15:30 IST

लाेकमत’ने या मार्गाचा प्रवास करून प्रवाशांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला असता, दिशादर्शक फलक दर्शनी भागात आणि माेठे नसल्याने हा महामार्ग प्रवाशांना गाेंधळात टाकणारा ठरत असल्याचे दिसून आले....

अजित घस्ते/आशिष काळे

पुणे : कायम काेंडीचा, अपघाताचा मार्ग अशी ओळख बनलेल्या राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील एनडीए चाैक (चांदणी चाैक) आणि इतर रस्त्यांचे उद्घाटन अगदी थाटामाटात शनिवारी (दि. १२) झाले. यामुळे काेंडी फुटेल आणि पुणेकरांना दिलासा मिळेल असे वाटत हाेते; परंतु प्रवास सुकर हाेण्याऐवजी गाेंधळात टाकणारा ठरत असल्याचाच अनेकांचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर ‘लाेकमत’ने या मार्गाचा प्रवास करून प्रवाशांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला असता, दिशादर्शक फलक दर्शनी भागात आणि माेठे नसल्याने हा महामार्ग प्रवाशांना गाेंधळात टाकणारा ठरत असल्याचे दिसून आले.

तब्बल आठ रस्ते या चाैकात एकत्र येत असल्याने येथून ये-जा करणाऱ्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी काेणता रस्ता निवडावा यावरून गाेंधळ उडत आहे. चांदणी चाैकाचे ‘एनडीए’ चाैक असे नामकरण झाले. आधीचा हा चाैक पाडून नवीन बांधण्यात आला. पूल पाडण्यापासून त्याचे उद्घाटन हाेईपर्यंत त्याचा माेठा गवगवा झाला. या चाैकामुळे मुंबई व सातारा रस्त्यांवरील वाहतूक काेंडी कमी झाली असली तरी येथून आसपासच्या गावाला कनेक्ट हाेणारे रस्ते मात्र भुलभुलैया ठरताना दिसत आहेत; कारण काेणत्या रस्त्याने काेठे वळायचे आणि इच्छित स्थळी कसे पुढे जायचे याबाबत गाेंधळ उडत आहे. त्यामुळे वाहनचालक प्रत्येक पाॅइंटवर आता पुढे कसे जायचे या विचाराने रेंगाळताना दिसून येत असल्याचे रविवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.

काेथरूडवरून भुगाव, मुळशीकडे जाताना...

काेथरूडवरून भुगाव व मुळशीकडे जुन्या मार्गाने उड्डाणपुलावरून जाताना एनडीए चाैकात इच्छित स्थळी कसे जायचे? याबाबत प्रवाशी तेथे थांबून सुरक्षारक्षकांना विचारत हाेते. भूगावला जाणारे दाेन मार्ग आहेत. एक मार्ग ३ किलाेमीटरचा वळसा मारून पुलावरून जाता येते. दुसरा मार्ग पुलाखालून आहे. त्यांपैकी प्रवासी मात्र जुना मार्ग असलेल्या फ्लायओव्हरवरून जाण्यास पसंती देतात. परंतु या मार्गाने जायचे असल्यास एनडीएच्या प्रवेशद्वारावरून वळसा मारावा लागताे. मात्र उड्डाणपुलाखालचा नवीन रस्ता साेयीचा असल्याचा दिसून आला.

भूगाव, मुळशीकडून पाषाणकडे जाताना...

या मार्गावर एक वळसा घेऊन एनडीए पुलावरून पाषाणकडे जाता येते. पुढे पूल ओलांडल्यावर एक सर्कल आहे. तेथून पुन्हा यू टर्न घेऊन काेथरूडच्या रस्त्याला लागता येते. काेथरूडला जाणाऱ्या या उड्डाणपुलावरून पुन्हा एनडीए चाैकाच्या पुलावर आल्यास मागून येणाऱ्या भरधाव वाहनांनी अंगावर काटा उभा राहताे. प्रत्येक रस्त्याच्या कनेक्टिंग पाॅइंटला असणारे दिशादर्शक फलक खूपच छाेटे असल्याने ते जवळ आल्याशिवाय दिसत नाहीत. त्यामुळे येथे प्रचंड गोंधळलेली स्थिती निर्माण हाेते.

मंडपाचा अडथळा :

एनडीएकडून पाषाण व बावधनकडे जाताना मंडपाचा अडथळा आला. पुलाच्या उद्घाटनासाठी जाे मंडप उभारला आहे ताे रस्त्यातच असल्याने हा रस्ता बंद आहे. मंडप काढण्याचे काम सुरू असले तरी ताेपर्यंत नागरिकांची गैरसाेय हाेत आहे.

दिशादर्शक फलक फारच लहान :

प्रत्येक रस्त्यावर दिशादर्शक फलक फारच छाेट्या आकाराचे आहेत. ते एकदम जवळ गेल्याशिवाय दिसत नाहीत. तर काही रस्त्याच्या एका काेपऱ्यात असल्याने तेथे फलक आहेत का? हेदेखील दिसत नाहीत. त्यामुळे चालक फलकाजवळ थांबून काेठे वळायचे याचा अंदाज घेताना दिसत आहेत.

अडचणी काय?

- लहान आकारातील दिशादर्शक फलक

- स्पीड ब्रेकरचा अभाव अन् मागून येणाऱ्या भरधाव वाहनांची भीती

या उपायाेजना आवश्यक :

- दिशादर्शक फलक माेठ्या आकारात असावे.

- प्रत्येक वळणाच्या आधी शंभर मीटरवर दिशादर्शक फलक हवे.

- सुरुवातीचे काही दिवस वाॅर्डनची नियुक्ती करायला हवी.

- रस्त्याच्या प्रत्येक कनेक्टिंग पाॅइंटवर स्पीड ब्रेकर बसवायला हवे.

काही निरीक्षणे -

- एनडीए चौक (चांदणी चौकात) तब्बल आठ रस्ते एकत्र येतात. त्यामुळे बाहेरगावच्या वाहनचालकांना रस्ता समजणे अवघड जात आहे. त्यामुळे भूगाव, मुळशीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनचालकांचा गाेंधळ उडत आहे. प्रथम पौड रोडवरून बावधन, पाषाणकडे जायचे. त्यासाठी एनडीएकडून पुलावरून जावे लागते. बावधन, पाषाण रोडला लागल्यानंतर पुन्हा यू टर्न घेऊन मुळशीकडे जायचे असेल, तर गोंधळ उडतो. याठिकाणी धोकादायक वळसा घेऊन जावे लागते.

- मुळशी रोडला लागल्यानंतर पुन्हा यू टर्न घेऊन तुम्ही मुळशीहून आलाय, असे समजून कोथरूडला जायचे असेल, तर पंचरवरून यू टर्न घेऊन पुन्हा यावे लागते. कोथरूडच्या रस्त्याला लागल्यावर पुन्हा यू टर्न घेऊन एनडीएला अथवा मुळशी, मुंबईकडे जायचे असल्यास रोड लक्षात येत नाही.

- दुचाकीस्वारांना उजवीकडे वळायचे असेल, तर मागून येणाऱ्या वाहनांची भीती वाटते. विशेषत: कोथरूडवरून मुंबईकडे अथवा साताऱ्याकडे जाताना, तसेच मुळशीकडून साताऱ्याकडे जाताना वेगाने येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वळणावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर हवेत.

- नूतनीकरण केलेल्या चांदणी चौक उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी. अर्थात, रविवारी याठिकाणी पाहणी केली असता मंडप आणि फ्लेक्स ‘जैसे थे’ हाेते.

नेमके घडले काय?

- मुंबई- सातारा व सातारा- मुंबई मार्ग पूर्वी दोन लेनचा हाेता, आता तीन लेनचा झाला.

- मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूंनी दोन सेवा रस्ते आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी फुटली.

मुख्य हायवे रस्ता वाहतूक मुक्त झाला असला तरी भूगाव, मुळशी, बावधन येथील रहिवाशांना मात्र वळसा घालून यावे लागत आहे. त्यामुळे साेयीचे हाेण्याऐवजी गैरसाेय हाेत आहे. पुलाचा वापर कसा होताेय, यावर भविष्य ठरणार आहे.

-महेंद्र कांबळे, बावधन रहिवासी

टॅग्स :Puneपुणेnda puneएनडीए पुणेbangalore-central-pcबंगलोर सेंट्रलMumbaiमुंबईkothrudकोथरूड