शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

गोसंरक्षण करणारी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 03:00 IST

देशी गाईंचे महत्त्व आता विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे.

पुणे : देशी गाईंचे महत्त्व आता विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे. मानवी जीवन तसेच शेतीसाठीही देशी गाय महत्त्वाची आहे. उपयोगी पडणाºया सर्व प्राणीमात्रांना मातृत्व देणे ही भारताची हजारो वर्षांची परंपरा आहे, म्हणूनच गोमातेला वाचवणारी एक सक्षम यंत्रणा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

गो विज्ञान संशोधन संस्था व दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम समिती यांच्या वतीने डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे भागवत यांच्या हस्ते मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार देण्यात आले. समितीचे अध्यक्ष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संशोधन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड, बापू कुलकर्णी, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर व्यासपीठावर उपस्थित होते. पिंगळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.

भागवत म्हणाले, देशी गाईंवर आधारीत शेतीतून पिकणारे धान्य विषमुक्त होते, आता खतांमधून तयार होणारे धान्य विषयुक्त आहे. कत्तलखान्यात जाणाºया गाई वाचवल्या तर त्या पाळण्यासाठी कोणी तयार होत नाही. कत्तलखान्यात गाई नेणारेही हिंदू ठेकेदारच असतात. म्हणूनच गो संरक्षण करणारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे व ते शक्य आहे.

मोरोपंत पिंगळे हे अशक्य कामे करणारे व्यक्तिमत्व होते. सरस्वती नदीचा त्यांनी शोध लावला. १५ व्या शतकापासून राम मंदिर बांधण्याचा प्रयत्न होत होता. पिंगळे यांनी ते काम हाती घेतले व आता मंदिर बांधले जाणार आहे. गो संरक्षण हाही त्यांचाच ध्यास होता, असे भागवत म्हणाले. कोलकाता येथील गो सेवा संस्था, तळेगाव दाभाडे येथील ज्योती मुदरंगी, भोसरी येथील अजित उदावंत, पुनम राऊत, शाम अगरवाल यांना गो सेवा पुरस्कार देण्यात आले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारcowगाय