शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

देशाला दुसऱ्या हरित क्रांतीची गरज :  राकेश मोहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 16:44 IST

देशाची आर्थिक प्रगती व्हायची असेल तर तुमच्या उद्योग क्षेत्राची प्रगती व्हायला हवी..

ठळक मुद्दे कृषी पूरक उद्योगांवर लक्ष देण्याची आवश्यकताकारची संख्या वाढतेय, करदात्यांची नाही

पुणे : उद्योग हा देशाच्या आर्थिक स्थितीचा कणा असतो. उत्पादनक्षम उद्योगांना प्रोत्साहन देताना कृषी आणि पूरक उद्योगांकडे देखील लक्ष द्यायला हवे. कृषी म्हणजे केवळ डाळी आणि धान्य असा विचार न करता त्या जोडीला मत्स्य शेती, दूध आणि दूध प्रक्रिया उद्योग, शेतमाल प्रक्रिया उद्योग अशी साखळीच उभारावी लागेल. त्यासाठी दुसरी कृषी क्रांती होण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी डेप्युटी गव्हर्नर डॉ. राकेश मोहन यांनी व्यक्त केले. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅँण्ड इकोनॉमिक्सच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात  ‘मूव्हींग इंडिया टून अ न्यू ग्रोथ ट्रॅजेक्टरी’ या विषयावर ते मंगळवारी बोलत होते. टाटा सन्सचे नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर इशात हुसैन उपस्थित होते. डॉ. मोहन म्हणाले, देशाची आर्थिक प्रगती व्हायची असेल तर तुमच्या उद्योग क्षेत्राची प्रगती व्हायला हवी. त्यात गेल्या काही वर्षांमधे वाढ होताना दिसत नाही. त्याच सोबत कृषी, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांमधे वाढ झाली पाहिजे. या सर्वांसाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आवश्यक असल्याने सर्वांना माध्यमिक शिक्षण मोफत दिले पाहीजे. उद्योगांमधे अधिकाधिक तंत्रज्ञान वाढविले पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकतील असे उद्योग निर्माण केले पाहिजे. तसेच, तयार झालेल्या उत्पादनाला शाश्वत बाजारपेठ मिळेल, यावर लक्ष द्यायला हवे. देशासह आशियाई देशांची एकूण लोकसंख्या ४ अब्ज आहे. आपल्या आजुबाजूलाच मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. त्या संधीचा उपयोग केला पाहिजे. औद्योगिक संस्थांच्या उभारणी पाठोपाठ कृषी आणि पूरक उद्योगाची वाढ झाली पाहिजे. आता धान्य व डाळी यावर आपण थांबता कामा नये. शेतकऱ्यांनाच पिकविलेल्या मालाचे पूरक उद्योग उपलब्ध करुन द्यायला हवेत. आपल्या आहारामधे कोणकोणते घटक वापरले जातात, हे पाहून उद्योगांची निर्मिती करावी. मत्स्यशेती, दूग्ध पदार्थांपासून उपपदार्थ अशा विविध प्रक्रिया उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्या जोडीला वाहतूक व साठवणुकीची सुविधा उभारायला पाहिजे, असे डॉ. मोहन म्हणाले. ---कारची संख्या वाढतेय, करदात्यांची नाहीदेशाच्या उभारणीसाठी करसंकलन हा एक महत्त्वाचा घटक असतो. मात्र, देशात चारचाकी वाहनांची संख्या वाढत असली तरी करदात्यांच्या संख्येत फारशी वाढ होताना दिसत नाही. उलट एकूण सकल उत्पन्नाच्या तुलनेत करदात्यांच्या टक्केवारील गेल्या दहा वर्षांत १२वरुन अकरापर्यंत घटझाली आहे. अगदी पुण्याचे उदाहरण घ्यायचे झाल्यास, अनेक आलिशान संकुले उभारलेली दिसतात. त्या तुलनेत करदात्यांची संख्या फारशी नाही. कराच्या टक्क्यात नव्हे, तर दात्यांच्या संख्येत वाढ झाली पाहीजे, असे डॉ. राकेश मोहन म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेagricultureशेती