शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus भारतीयांना रोगप्रतिकारशक्ती वाचवेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 05:37 IST

कोरोना व्हायरसच्या मुद्यावर वैद्यकीय व्यावसायिकांत चर्चा : अभ्यास व संशोधनाची व्यक्त होते आहे गरज

राजू इनामदार।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जगण्याच्या लढाईत तिन्ही त्रिकाळ वेगवेगळ्या समस्यांना निधड्या छातीने तोंड देणाऱ्या भारतीयांना आजार काही नवे नाहीत. त्यांचा हा निर्धार गुणसूत्रांमधलाच असला तर कोरोना विषाणूंवरही ते यशस्वी मात करतील, अशी चर्चा वैद्यक क्षेत्रातील जाणकारांमध्ये कोरोना व्हायरसच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. त्याचाच वेध काही तज्ज्ञ डॉक्टरांबरोबर बोलून घेतला असता त्यांनी यावर अधिक अभ्यास व संशोधन होण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक व्यक्तीची गुणसूत्रे वेगवेगळी असतात, मात्र त्यातही प्रदेश, वातावरण, वंश अशा काही गोष्टींचा कणमात्र का होईना एक भाग असतोच, भारतीयांमधील हा भाग या लढाईत कदाचित उपयोगी पडू शकतो, असा एक अंदाज यातून व्यक्त होताना दिसतो आहे.पँथॉलाजिस्ट (एम.डी.) डॉ. मंदार परांजपे यासंबधी बोलताना म्हणाले, जगात सर्वत्र या विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही तो पोहचलाच आहे. मानवी शरीरात रक्तामध्ये लाल व पांढºया पेशी असतात. त्यातील पांढºया पेशी बाहेरून शरीरात आलेल्या विषाणूंबरोबर लढण्याचे काम करतात. पांढºया पेशी लढत असताना कधीकधी त्यातून घातक असे सायटोकाईन स्टॉर्म निर्माण होते. त्यात ‘आयएल६’हे एक प्रकारचे रसायन निर्माण होते. सायटोकाईन स्टॉर्म हे रुग्णासाठी प्राणघातक ठरू शकते. सायकोकाईन स्टॉर्म निर्माण होण्याची संभाव्यता ही पांढर्या पेशीवर असलेल्या विशिष्ट ‘मून ल्यूकोसाईट अँन्टीजेन नुसार ठरते.डॉ. परांजपे पुढे म्हणाले, भारतीयांच्या पांढºया पेशींवर जे विशिष्ट ‘मून ल्युकोसाईट अँन्टीजेन’ जास्त प्रमाणात आहेत, त्यांच्यामुळे सायटोकाईन स्टॉर्मची संभाव्यता कमी होत असावी आणि त्यामुळेच कदाचित आपल्याकडे या विषाणूपासूनचा मृत्यूदर कमी राहत असावा, असा एक आशावादी शास्त्रीय अंदाज व्यक्त होतो आहे. पण अजून हे संशोधनाद्वारे सिद्धझाले नसल्यामुळे आपण अजिबात गाफील राहून चालणार नाही. आवश्यक ती सर्व काळजी आपण सर्वांनी घेतलीच पाहिजे.भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती इतरांपेक्षा अधिक चांगली...डॉ. अनंत फडके हेही वैद्यक क्षेत्रातील नावाजलेले तज्ज्ञ आहेत. ते म्हणाले, ‘या मुद्यांवर चर्चा सुरू आहे हे बरोबर आहे, मात्र ती प्राथमिक स्तरावर आहे. हा विषाणू नवा आहे, त्याची लक्षणे नवी आहेत. भारतीयांची रोग प्रतिकारशक्ती अन्य लोकसमूहांपेक्षा निश्चितच चांगली आहे.’४पण या नव्या विषाणूच्या आजारासमोर ती कसा व किती टिकाव धरेल यावर अभ्यास व अधिक संशोधन होण्याची गरज आहे. तसा अभ्यास व संशोधन सुरूही असेल किंवा आहे. त्यातून पुढे काही शास्त्रीय कसोटीवर सिद्ध झाले तरच यावर खात्रीपूर्वक बोलता येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या