शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

coronavirus: लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्यांसाठी राज्यांतर्गत प्रवास मोफत नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 22:06 IST

केवळ परराज्यातील व्यक्तींना राज्याच्या सीमेपर्यंत नेणे आणि महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या लोकांना सीमेवरून मुळ जिल्ह्यात पोहचविण्यासाठीच बससेवा मोफत असणार आहे.

पुणे : राज्यात ठिकठिकाणी अडकलेले मजुर, कामगार, विद्यार्थ्यांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने रद्द केला आहे. केवळ परराज्यातील व्यक्तींना राज्याच्या सीमेपर्यंत नेणे आणि महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या लोकांना सीमेवरून मुळ जिल्ह्यात पोहचविण्यासाठीच बससेवा मोफत असणार आहे. त्यानुसार एसटी महामंडळाकडून संबंधित प्रवाशांकडून तिकीट आकारले जाणार आहे.राज्य शासनाचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शनिवारी (दि. ९) एका आदेशद्वारे मुळ गावी जाऊ इच्छिणाºया सर्वांना एसटीतून मोफत प्रवास करू दिला जाणार असल्याचा आदेश काढला होता. पण त्यानंतर काही तासातच या आदेशामध्ये दुरूस्ती करून दुसरा आदेश काढण्यात आला. सुधारीत आदेशाप्रमाणे इतर राज्यातील जे मजूर व इतर नागरीक  महाराष्ट्रात विविध ठिकाणी अकडलेले असतील त्यांना महाराष्ट्राच्या सिमेपर्यंत घेऊन जाणे व महाराष्ट्रातील रहिवासी असलेले मजुर व इतर व्यक्ती जे इतर राज्यांतून महाराष्ट्राच्या सिमेपर्यंत आले आहेत, त्यांना त्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहचविण्यासाठी एसटीची सेवा मोफत असेल. याशिवाय कोणत्याही इतर प्रवासासाठी बससेवा मोफत उपलब्ध असणार नाही, असे सुधारीत आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार एसटी महामंडळाकडून तिकीटाची आकारणी केली जाणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. यासंदर्भात एसटीतील अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या सुधारीत आदेशाप्रमाणे तिकाटाची आकारणी केली जाणार आहे. एसटीने प्रति बस प्रति किलोमीटर ४४ रुपये तिकीट दर निश्चित केला आहे. सुरक्षित अंतरासाठी एका बसमध्ये जास्तीत जास्त २२ प्रवासी असतील. त्यानुसार या प्रवाशांकडून किलोमीटरप्रमाणे विभागून पैसे आकारले जातील. एसटीकडे पैसे जणा झाल्यानंतर बस सोडण्यात येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडूनच प्रवाशांची नोंदणीनुसार बसची मागणी केली जात आहे. राज्यात ठिकठिकाणी जाण्यासाठी प्रशासनाकडून सध्या विविध ठिकाणी जाण्यासाठी बसची मागणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सवलत द्यावीमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी विद्यार्थ्यांना एसटीचा प्रवास मोफत करण्याची मागणी केली आहे.  परप्रांतीयांना एसटी व रेल्वेचा प्रवास मोफत दिला जात आहे, मात्र राज्याचे भविष्य असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून पैसे वसुल केले जात आहेत. राज्य शासनाने याचा विचार करून मोफत सेवा द्यावी, असे यादव यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारstate transportएसटी