शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

Corona virus : धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू, येरवड्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 00:22 IST

येरवड्यातील संत ज्ञानेश्वर वसतीगृह येथील दुर्दैवी घटना 

पुणे : कोरोना पॉझिटिव्ह महिलेला वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची गंभीर घटना येरवड्यातील संत ज्ञानेश्वर वसतिगृह येथे गुरुवारी दुपारी घडली.

आशा पुरुषोत्तम पाटील (वय 45 रा. चौधरी नगर मुंजाबा वस्ती धानोरी) असे मृत्यू झालेेल्या महिलेेेचे नाव आहे. महापालीकेेने शहरात अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथे कोरोना पॉझिटिव्ह सामान्य रुग्णांवर उपचार केले जातात. येरवड्यातील सेंटरमध्ये आवश्यक योग्य उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे या महिलेचा 24 तासात मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणी जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी येरवडा नागरिक कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा पाटील व पुरुषोत्तम पाटील यांची बुधवारी कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी शांतीनगर येथील संत ज्ञानेश्वर वसतिगृह येथे सायंकाळी पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी करून आवश्यक औषधे दिल्यानंतर आशा यांना तिसऱ्या मजल्यावर तर पती पुरुषोत्तम यांना दुसऱ्या मजल्यावर खोली मिळाली होती. बुधवारी रात्रीपासून आशा यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. गुरुवारी सकाळी 11 वाजता श्वास घेण्यासाठी जास्त त्रास होऊ लागल्यामुळे याची माहिती डॉक्टरांना दिल्यावर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यांची प्रकृती जास्त खालावल्यामुळे दुपारी त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

आशा यांना ऑक्सिजन व इतर आवश्यक साधने देखील वेळेवर मिळाली नसल्याचे त्यांचे पती पुरुषोत्तम पाटील यांनी सांगितले. तसेच पत्नीला जर वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पुरुषोत्तम पाटील हे पत्नी आशा यांच्यासह भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

 .  

टॅग्स :YerwadaयेरवडाWomenमहिलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू