शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

Corona virus :शहरातील लोक परतल्याने गावांवरही ‘कोरोना’चे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 22:30 IST

शहरांमधून आलेल्या नागरिकांना तपासण्यासाठी गावांमध्ये कोणत्याही स्वरुपाची यंत्रणा सध्या दिसत नाही.

ठळक मुद्देमुंबई-पुण्यातील लोकांचे गावाकडे लोंढे सुरूच बारामतीसह भोर, वेल्हा, मुळशी, दौंड, इंदापूर भागातील लोक पुण्यामध्ये काम करतात.

पुणे : मुंबई-पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने व जिल्हा प्रशासनाने संपूर्ण ‘शटडाऊन’चे संकेतदेखील दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध कामानिमित्त, नोकऱ्यांसाठी मुंबई, पुण्यामध्ये वास्तव्यास असलेले नागरिक भीतीने आपापल्या गावाकडे परतत आहेत. गेल्या एक-दोन दिवसांत गावा-गावात शेकडो नागरिक परत आले आहेत. शहरी भागांसारखी आरोग्य व्यवस्था गावांमध्ये नसल्याने व पुणे-मुंबईमधून आलेल्या या नागरिकांमुळे सध्या शहरासोबत ग्रामीण भागामध्ये गावा-गावांमध्ये ‘कोरोना’चे मोठे सावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरांमधून आलेल्या नागरिकांना तपासण्यासाठी गावांमध्ये कोणत्याही स्वरुपाची यंत्रणा सध्या दिसत नाही. यामुळे पुणे जिल्ह्यासाठी ही मोठी धोक्याची घंटा ठरू शकते. पुणे जिल्ह्यातील प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील घरटी लोक विविध कामधंद्यासाठीअथवा नोकरीसाठी मुंबईमध्ये आहेत. बारामतीसह भोर, वेल्हा, मुळशी, दौंड, इंदापूर भागातील लोक पुण्यामध्ये काम करतात. पुणे शहरामध्ये ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल २८ वर जाऊन पोहोचली आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी संख्या तब्बल ३८ वर गेली आहे. यामुळे पुणे, मुंबईमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबईमध्ये संबंधित प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच कोरोनाच्या धास्तीने शहरामध्ये राहणारे बहुतेक नागरिक आपल्या गावांकडे परत जात आहे. यामुळे सध्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शहरामधून आलेल्या नागरिकांची जत्रा-यात्रांसारखी गर्दी होऊ लागली आहे. आंबोली गावालगतच्या आठ-दहा गावांसाठी हे प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेव आधार आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत आंबोलीसह लगतच्या गावांमध्ये किमान ७००-८०० पुणे-मुंबईमधील नागरिक आले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या ग्रामीण भागातील गावांवरही ‘कोरोना’चे सावट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात बहुतेक तालुक्यांमध्ये आठ-दहा गावे मिळून एखादे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. यातही दुर्गम तालुक्यांमध्ये १०-२० मैल गावांमध्ये साधे मेडिकलदेखील नाही. गावातील लोक आजारी पडल्यास थेट तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. सध्या पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट उभे राहिले आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थितीदेखील बिकट आहे. खेड तालुक्यातील दुर्गम भागातील आंबोली ग्रामपंचायतींच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकच परिचारिका कार्यरत असून, साध्या सर्दी, खोकल्याचीदेखील पुरेशी औषधे उपलब्ध नाहीत.--------------------प्रत्येक गावांमध्ये तपासणी सुरू करणारपुणे, मुंबईसह राज्याच्या विविध शहरांमधून नागरिक आपल्या गावांकडे परत आले आहेत. शहरी भागातून गावांमध्ये आलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. यामुळे येत्या एक-दोन दिवसांत प्रत्येक गावांमध्ये तपासणी सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत साडेसहा लाखांपेक्षा अधिक घरांमध्ये तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा सर्व गावांची तपासणी करण्यात येईल. - आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBaramatiबारामतीIndapurइंदापूरpassengerप्रवासी