शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : कोरोना विषाणूंपासून स्वत:च्या बचावासाठी नायडू रुग्णालयातील डॉक्टर 'अशी ' घेतात काळजी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 14:02 IST

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांनाच या विषाणूने गाठल्याच्या घटना जगात अनेक ठिकाणी घडल्या आहेत...

ठळक मुद्देविशेष पोशाखाशिवाय प्रवेश नाही : दोन वेळा आंघोळ आणि दर तासाने हात धुणे 

पुणे : सगळे जग कोरोना विषाणूंपासून दूर राहण्याची काळजी घेत असताना महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील अनेक डॉक्टर, परिचारिकांना मात्र रोज याच विषाणूंच्या सान्निध्यात वावरावे लागते. कोरोनाबाधित आणि संशयितांवर उपचार करताना हा विषाणू स्वत:लाही गाठू शकतो, याची शक्यता गृहीत धरून त्यांना हे जोखमीचे काम करावे लागत आहे. त्यामुळेच कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सर्व शक्यता बाद करण्यासाठीच्या सर्व मार्गांचा अवलंब त्यांच्याकडून केला जात आहे. कोरोना विषाणूसंदर्भातले उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांनाच या विषाणूने गाठल्याच्या घटना जगात अनेक ठिकाणी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या मंडळींकडून विशेष काळजी घेतली जात आहे. या संदर्भातली माहिती त्यांनी दिली.   कोरोना रुग्ण आणि संशयितांच्या सान्निध्यात असणाऱ्यांचे कपडे, रुमाल आदी वस्तू इतर कोणालाही वापरू दिल्या जात नाहीत. विशेष पोशाख परिधान केल्याशिवाय रुग्णालयाच्या या कक्षात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. हा पोशाखही वारंवार निर्जंतुक केला जातो. रुग्णाच्या तपासणीसाठी डॉक्टर आणि परिचारिकेला दर एक तासाने जावेच लागते. या तपासणीनंतर लगेचच हात स्वच्छ धुतले जातात. ‘डॉ. नायडू रुग्णालयात काम करतो हे ज्यांना माहिती आहे, त्यांची आमच्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलली आहे,’ असे मत एका डॉक्टरांनी व्यक्त केले. एरवी महापालिकेचे दवाखाने व तिथे काम करणारे डॉक्टर समाजातील एका विशिष्ट वर्गाकडून कायम टीकेचे लक्ष्य केले जातात. कोरोना या जागतिक आपत्तीच्या काळात मात्र हे रुग्णालय व तेथील डॉक्टर, परिचारिका आता मात्र देशवासियांच्या अभिमानाचा विषय झाले आहेत. ..............रुग्णालयातले कामाचे तास संपल्यानंतर हे डॉक्टर आणि परिचारिका कधीही थेट घरात जात नाहीत. घरापासून दूर अंतरावर ते थांबतात. त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती त्यांच्यासमोर प्लॅस्टिकचे अथवा धातूचे एखादे भांडे ठेवते. त्यात हातातील घड्याळ, पेन, पट्टा, मोबाईल अशा वस्तू ठेवल्या जातात. त्यावर जंतुनाशक फवारले जाते. त्यानंतरही बराच काळ त्या वस्तू तशाच ठेवल्या जातात. 

संबधित डॉक्टर आणि परिचारिकेच्या शरीरावरही जंतुनाशकाचा फवारा मारला जातो. यानंतर घरातल्या कोणत्याच वस्तूला, व्यक्तीला स्पर्श न करता ही मंडळी आंघोळीसाठी थेट स्नानगृहात जातात. आंघोळीपूर्वी सर्व कपडे साबणाच्या गरम पाण्यात भिजवले जातात. रोजच्या रोज कपडे बदलले जातात. रोज दोनदा गरम पाण्याने आंघोळ केली जाते. दर तासाला जंतुनाशकाने हात स्वच्छ केले जातात. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर