शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

corona virus : पत्रिका वाटल्या, देवक बसले पण लग्न पुढे ढकलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 21:03 IST

मागील दोन आठवड्यापासून पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. अशावेळी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन नागरिकांनी एकत्र येण्याचे टाळावे असे आवाहन करत आहे. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, कौटुंबिक सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लोकांनी एकत्र जमणे विषाणूच्या प्रसारासाठी अनुकूल असल्याने वारंवार अशा कृती टाळण्याविषयी सूचना करण्यात येत आहेत.

पुणे :खरेदी  झाली, पत्रिका वाटल्या, ग्रहमग झाले, देवक बसले आणि लग्न मात्र पुढे ढकलावे लागले. ही गोष्ट आहे पुण्यातील अश्विनी जमदाडे आणि प्रवीण कदम यांची. कोरोनामुळे त्यांनी आपले नियोजित लग्न पुढे ढकलले आहे. पुण्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावरच ते विवाहगाठ बांधणार आहेत . स्वतःपुरता विचार न करता इतरांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेला हा निर्णय कौतूकास्पदच म्हणायला हवा. 

१९ मार्चला पुण्यात अश्विनी आणि प्रवीण विवाहबद्ध होणार होते. पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्यांनी लग्नाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन आठवड्यापासून पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. अशावेळी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन नागरिकांनी एकत्र येण्याचे टाळावे असे आवाहन करत आहे. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, कौटुंबिक सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लोकांनी एकत्र जमणे विषाणूच्या प्रसारासाठी अनुकूल असल्याने वारंवार अशा कृती टाळण्याविषयी सूचना करण्यात येत आहेत. त्यातच सध्या लग्नसराई असल्याने त्याठिकाणी कमीतकमी नातेवाईक असावेत अशी विनंती करण्यात येत आहे. हाच विचार मनाशी धरून जमदाडे आणि कदम कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे. 

याबाबत बोलताना नियोजित वधूची आई सुनीता जमदाडे म्हणाल्या की, 'मुलीचं लग्न हे प्रत्येक आईचं स्वप्नं असतं. मनात एक धाकधूक असते. सुरुवातीला कोरोनाबद्दल ऐकलं तेव्हा त्याचा प्रभाव आमच्या कार्यावरदेखील पडेल असं वाटलं नव्हतं. पण जेव्हा पुण्यात सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही लक्ष ठेवून होतो. अखेर सरकारने केलेल्या सूचनांचा विचार केला आणि दोन्ही कुटुंबांनी तारीख पुढे घेण्याचे ठरवले. नियोजित वधू अश्विनी म्हणाली की, 'लग्न पुढे गेल्याचं दुःख आहेच. पण त्यातून उद्या कोणाला प्रादुर्भाव झाला तर ते अधिक वाईट असेल. शेवटी लग्न जरी आमचं असलं तरी नातेवाईक आणि समाजाच्या आरोग्याचा प्रश्नही महत्वाचा आहे. आता सगळे विधी झाले आहेत, आज खरं तर हातावर मेहंदी रंगली असती पण सगळेच आता पुढे ढकलले आहे 

नातेवाईकांना कळवण्याची कसरत 

जमदाडे कुटुंबीयांनी  नातेवाईक, आप्तजन यांना लग्नपत्रिका वाटल्या होत्या. इतकेच नव्हे तर वोट्स ऍपवरूनही आमंत्रणे गेली होती. मात्र दोन दिवस आधी हा निर्णय घेतल्याने त्यांनी फोन करून नातेवाईकांना न येण्यास सांगितले आहे. अजूनही त्यांचे काहींना फोन सुरु आहेत.  अर्थात त्यामागचे कारण ऐकल्यावर अनेकांनी कौतुक केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न