शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

corona virus : पत्रिका वाटल्या, देवक बसले पण लग्न पुढे ढकलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 21:03 IST

मागील दोन आठवड्यापासून पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. अशावेळी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन नागरिकांनी एकत्र येण्याचे टाळावे असे आवाहन करत आहे. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, कौटुंबिक सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लोकांनी एकत्र जमणे विषाणूच्या प्रसारासाठी अनुकूल असल्याने वारंवार अशा कृती टाळण्याविषयी सूचना करण्यात येत आहेत.

पुणे :खरेदी  झाली, पत्रिका वाटल्या, ग्रहमग झाले, देवक बसले आणि लग्न मात्र पुढे ढकलावे लागले. ही गोष्ट आहे पुण्यातील अश्विनी जमदाडे आणि प्रवीण कदम यांची. कोरोनामुळे त्यांनी आपले नियोजित लग्न पुढे ढकलले आहे. पुण्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावरच ते विवाहगाठ बांधणार आहेत . स्वतःपुरता विचार न करता इतरांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेला हा निर्णय कौतूकास्पदच म्हणायला हवा. 

१९ मार्चला पुण्यात अश्विनी आणि प्रवीण विवाहबद्ध होणार होते. पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्यांनी लग्नाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन आठवड्यापासून पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. अशावेळी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन नागरिकांनी एकत्र येण्याचे टाळावे असे आवाहन करत आहे. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, कौटुंबिक सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लोकांनी एकत्र जमणे विषाणूच्या प्रसारासाठी अनुकूल असल्याने वारंवार अशा कृती टाळण्याविषयी सूचना करण्यात येत आहेत. त्यातच सध्या लग्नसराई असल्याने त्याठिकाणी कमीतकमी नातेवाईक असावेत अशी विनंती करण्यात येत आहे. हाच विचार मनाशी धरून जमदाडे आणि कदम कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे. 

याबाबत बोलताना नियोजित वधूची आई सुनीता जमदाडे म्हणाल्या की, 'मुलीचं लग्न हे प्रत्येक आईचं स्वप्नं असतं. मनात एक धाकधूक असते. सुरुवातीला कोरोनाबद्दल ऐकलं तेव्हा त्याचा प्रभाव आमच्या कार्यावरदेखील पडेल असं वाटलं नव्हतं. पण जेव्हा पुण्यात सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही लक्ष ठेवून होतो. अखेर सरकारने केलेल्या सूचनांचा विचार केला आणि दोन्ही कुटुंबांनी तारीख पुढे घेण्याचे ठरवले. नियोजित वधू अश्विनी म्हणाली की, 'लग्न पुढे गेल्याचं दुःख आहेच. पण त्यातून उद्या कोणाला प्रादुर्भाव झाला तर ते अधिक वाईट असेल. शेवटी लग्न जरी आमचं असलं तरी नातेवाईक आणि समाजाच्या आरोग्याचा प्रश्नही महत्वाचा आहे. आता सगळे विधी झाले आहेत, आज खरं तर हातावर मेहंदी रंगली असती पण सगळेच आता पुढे ढकलले आहे 

नातेवाईकांना कळवण्याची कसरत 

जमदाडे कुटुंबीयांनी  नातेवाईक, आप्तजन यांना लग्नपत्रिका वाटल्या होत्या. इतकेच नव्हे तर वोट्स ऍपवरूनही आमंत्रणे गेली होती. मात्र दोन दिवस आधी हा निर्णय घेतल्याने त्यांनी फोन करून नातेवाईकांना न येण्यास सांगितले आहे. अजूनही त्यांचे काहींना फोन सुरु आहेत.  अर्थात त्यामागचे कारण ऐकल्यावर अनेकांनी कौतुक केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न