शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

corona virus : पत्रिका वाटल्या, देवक बसले पण लग्न पुढे ढकलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 21:03 IST

मागील दोन आठवड्यापासून पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. अशावेळी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन नागरिकांनी एकत्र येण्याचे टाळावे असे आवाहन करत आहे. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, कौटुंबिक सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लोकांनी एकत्र जमणे विषाणूच्या प्रसारासाठी अनुकूल असल्याने वारंवार अशा कृती टाळण्याविषयी सूचना करण्यात येत आहेत.

पुणे :खरेदी  झाली, पत्रिका वाटल्या, ग्रहमग झाले, देवक बसले आणि लग्न मात्र पुढे ढकलावे लागले. ही गोष्ट आहे पुण्यातील अश्विनी जमदाडे आणि प्रवीण कदम यांची. कोरोनामुळे त्यांनी आपले नियोजित लग्न पुढे ढकलले आहे. पुण्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावरच ते विवाहगाठ बांधणार आहेत . स्वतःपुरता विचार न करता इतरांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेला हा निर्णय कौतूकास्पदच म्हणायला हवा. 

१९ मार्चला पुण्यात अश्विनी आणि प्रवीण विवाहबद्ध होणार होते. पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्यांनी लग्नाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन आठवड्यापासून पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. अशावेळी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन नागरिकांनी एकत्र येण्याचे टाळावे असे आवाहन करत आहे. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, कौटुंबिक सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लोकांनी एकत्र जमणे विषाणूच्या प्रसारासाठी अनुकूल असल्याने वारंवार अशा कृती टाळण्याविषयी सूचना करण्यात येत आहेत. त्यातच सध्या लग्नसराई असल्याने त्याठिकाणी कमीतकमी नातेवाईक असावेत अशी विनंती करण्यात येत आहे. हाच विचार मनाशी धरून जमदाडे आणि कदम कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे. 

याबाबत बोलताना नियोजित वधूची आई सुनीता जमदाडे म्हणाल्या की, 'मुलीचं लग्न हे प्रत्येक आईचं स्वप्नं असतं. मनात एक धाकधूक असते. सुरुवातीला कोरोनाबद्दल ऐकलं तेव्हा त्याचा प्रभाव आमच्या कार्यावरदेखील पडेल असं वाटलं नव्हतं. पण जेव्हा पुण्यात सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही लक्ष ठेवून होतो. अखेर सरकारने केलेल्या सूचनांचा विचार केला आणि दोन्ही कुटुंबांनी तारीख पुढे घेण्याचे ठरवले. नियोजित वधू अश्विनी म्हणाली की, 'लग्न पुढे गेल्याचं दुःख आहेच. पण त्यातून उद्या कोणाला प्रादुर्भाव झाला तर ते अधिक वाईट असेल. शेवटी लग्न जरी आमचं असलं तरी नातेवाईक आणि समाजाच्या आरोग्याचा प्रश्नही महत्वाचा आहे. आता सगळे विधी झाले आहेत, आज खरं तर हातावर मेहंदी रंगली असती पण सगळेच आता पुढे ढकलले आहे 

नातेवाईकांना कळवण्याची कसरत 

जमदाडे कुटुंबीयांनी  नातेवाईक, आप्तजन यांना लग्नपत्रिका वाटल्या होत्या. इतकेच नव्हे तर वोट्स ऍपवरूनही आमंत्रणे गेली होती. मात्र दोन दिवस आधी हा निर्णय घेतल्याने त्यांनी फोन करून नातेवाईकांना न येण्यास सांगितले आहे. अजूनही त्यांचे काहींना फोन सुरु आहेत.  अर्थात त्यामागचे कारण ऐकल्यावर अनेकांनी कौतुक केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न