शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

"कोरोना नष्ट व्हावा व सामान्य जनजीवन व वारी पुन्हा पूर्वीच्याच दिमाखाने साजरी व्हावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 20:31 IST

Neelam Gorhe : विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी आळंदी येथील संजीवनी समाधीस पुष्पहार अर्पण केला

आळंदी - आषाढी व कार्तिकी हे महाराष्ट्राच्या समाज जीवनाचे अभिन्न अंग आसून शेकडो वर्ष पंढरीच्या वारीचे लाखो वारकरी व नागरिक या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. मात्र कोरोना महामारीमुळे मोजक्याच भक्तांच्या सहभागाने हा सोहळा तितक्याच उत्साहाने संपन्न होत आहे. आज संतशिरोमणि श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. या निमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी आळंदी येथील संजीवनी समाधीस पुष्पहार अर्पण केला. तसेच महाराष्ट्र व देशातील कोरोना नष्ट व्हावा व सामान्य जनजीवन व वारी पुन्हा पूर्वीच्याच दिमाखाने साजरी व्हावी अशी प्रार्थना माऊली चरणी  केली. 

महाराष्ट्रातील तमाम जनता अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवार हा देखील विठ्ठल भक्त आहे आळंदीशी शिवसेनेचे अतूट नाते असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. वारकरी तर सर्वांमध्ये विठ्ठल पाहतात असे संगितले. तसेच अन्नदानासाठी देणगी डॉ.गोऱ्हे यांनी दिली. तसेच मंदिर परिसरातील ज्याप्रमाणे सजावट आणि व्यवस्था केली आहे ती अतिशय आकर्षक असल्याचे देखील त्या म्हणाल्या. 

सन १८९७ मध्ये प्लेगचा प्रार्दुभाव वाढला होता त्यावेळी ज्योतिबाची यात्रा बंद करण्याचा श्रीमन्महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी निर्णय घेतला होता. याच थोर लोकांच्या पावलावर पाऊल टाकत असून उत्तम सरकार चालवत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. त्यामुळे विरोध काय टीका करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोत आणि टिकेला महत्त्व देत नाही. 

या प्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे सीईओ अंकुश जाधव,आळंदी देवस्थान ट्रस्टचे अभय टिळक, योगेश देसाई, सोहळा प्रमुख विकास ढगे, माजी जिल्हा प्रमुख राम गावडे, नगरसेविका शैला अविनाश तापकिर, शहरप्रमुख अविनाश तापकिर, विजयताई शिंदे, मंगलताई सोनवणे, उपशहर प्रमुख आनंद गोयल, पोलिस निरीक्षक मोहन यादव, उपनिरीक्षक जोंधळे, तम्मा विटकर, युवराज शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :AlandiआळंदीNeelam gorheनीलम गो-हेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र