कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल दीड लाख कोटींची तूट : उपमुख्यमंत्री अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 11:39 AM2021-08-28T11:39:06+5:302021-08-28T11:39:59+5:30

मागील दीड वर्षांपासून असलेल्या कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीत दीड लाख कोटींची तूट आली आहे.

Corona causes deficit of Rs 1.5 lakh crore in state coffers: Deputy Chief Minister Ajit Pawar | कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल दीड लाख कोटींची तूट : उपमुख्यमंत्री अजित पवार 

कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल दीड लाख कोटींची तूट : उपमुख्यमंत्री अजित पवार 

Next
ठळक मुद्देबारामती येथे मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या प्रकल्पाचे भूमिपूजन 

बारामती : राज्याच्या तिजोरीमध्ये दरवर्षी साडेचार लाख कोटीं रूपये जमा होत असतात. मागील दीड वर्षांपासून असलेल्या कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीत दीड लाख कोटींची तूट आली आहे. परिणामी विकासकामांसाठी निधीची मोठ्याप्रमाणात कमतरता जाणवू लागली आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकार वेगवेगळया प्रकल्पांसाठी योजना राबवून निधी देत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे दिली.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचे भूमीपूजन शनिवारी (दि. २८) बारामती कृषि उत्पन्न बजार समितीच्या जळोची उपबाजारामध्ये पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये फलोत्पादन योजना राबवण्यात आली. केंद्रीय कृषी मंत्रीपदाच्या कार्यकाळात हीच योजना पवार साहेबांनी राष्ट्रीय पातळीवर नेली. त्याचा परिणाम म्हणजे राज्यासह देशात फळांच्या उत्पादनात वाढ झाली. बारमाही फळे उपलब्ध झाली. मात्र कृषीमुल्य साखळीच्या टप्प्यात ४० टक्के तर शेतकरी ते ग्राहक या प्रक्रियेमध्ये अजुनही फळे, भाजीपाला यांचे ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी राज्यभरात मॅग्नेट प्रकल्पाव्दारे महाराष्ट्रामध्ये सुमारे १ हजार 100 कोटीची कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत हा पहिला प्रकल्प बारामतीमध्ये उभारण्यात आला आहे.

तत्पूर्वी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील बोलताना म्हणाले, देशातील फळे निर्यातीमध्ये राज्यातील शेतकºयांचा वाटा मोठा आहे. डाळींब, केळी , संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी,  मिरची (हिरवी व लाल) व फुलपिके आदींना जागतिक बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असते. काढणीपश्चात शेतकºयांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व जागतिक बाजारपेठेतील चांगल्या दराचा फायदा येथील शेतकºयांना व्हावा या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यावेळी सहकार व पणन  प्रधान सचिव अनुप कुमार, कार्यकारी संचालक सुनिल पवार, सरव्यवस्थापक व मॅग्नेटचे प्रकल्प संचालक   दिपक शिंदे, सभापती समिती  वसंत गावडे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, संभाजी होळकर, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. 
------------------------

बाजार समितीच्या माध्यमातून पेट्रोल पंप, सिएनजी सेंटर  उभे करण्यात येत आहे. जेणेकरून बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी हा उद्देश आहे. तसेच सुपे येथे देखील नव्याने बाजार समितीच्या अंतर्गत पेट्रोेलपंप उभारण्यात येत आहे. तर जळोची येथील जनावरे बाजार पुढील काळात तालुक्यातील झारगडवाडी येथे हलविण्यात येणार आहे. त्यासाठी २५ एकर जारा घेण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 
---------------------------
यापुढे राज्य सरकार डिझेलवर चालणाऱ्या एसटी बस घेणार नाही. सध्या इंधन टंचाईचे मोठे संकट एसटीवर आहे. त्यासाठी सीएनजी चालणाऱ्या इलेक्ट्रीक बस राज्य सरकार टप्प्याटप्प्याने घेणार आहे. एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी पैैसे नव्हते. काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ५०० कोटी रूपये दिले आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 
--------------------------

Web Title: Corona causes deficit of Rs 1.5 lakh crore in state coffers: Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.