शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

भात पिकासाठी तण नियंत्रण करा : कृषी विभागाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 14:52 IST

भारतीय हवामान खाते, कृषी हवामान प्रभागाच्या वतीने राज्यासाठी मंगळवारी (दि. १७) कृषी सल्ला जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देपेरणी न झालेल्या ठिकाणी २० टक्के जास्त बियाणे वापरावीत

पुणे : भात पिकातील तण नियंत्रित करावे आणि अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी नत्र आणि स्फुरदच्या गोळ्या टाकाव्यात, तसेच जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी नाचणी, भुईमूग आणि सोयाबीनच्या शेतातील अतिरिक्त पाणी काढून टाकावे, असा सल्ला कृषी हवामान प्रभागाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी दिला आहे. भारतीय हवामान खाते, कृषी हवामान प्रभागाच्या वतीने राज्यासाठी मंगळवारी (दि. १७) कृषी सल्ला जाहीर करण्यात आला. खरीप पिकांची पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी करताना २० टक्के अधिक बियाणे वापरावेत असा सल्ला पुणे, सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यासाठी देण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील कापूस पट्ट्यात शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमन सापळे लावावेत. तसेच जिनिंग मिलच्या आसपासच्या २ किलोमीटर क्षेत्रातही असे सापळे लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खरीप पिके, भाजीपाला आणि फळबागांमधील अतिरिक्त पाणी चराद्वारे बाहेर काढावे असेही सुचविण्यात आले आहे. कोल्हापुर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जास्त पाऊस झालेल्या भागात नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मका आणि ऊस लागवड झालेल्या शेतातील अतिरिक्त पाणी काढून टाकावे. भात आणि नाचणी पिकाची पुर्नलागवड लवकरात लवकर करावी असा सल्ला देण्यात आला आहे. लवकर लागवड झालेल्या भात पिकामध्ये तण नियंत्रण करावे. तसेच, अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा व्हावा या साठी भात शेतात नत्र आणि स्फुरदच्या १६९ किलो गोळ्या प्रतिहेक्टर द्याव्यात, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.   

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीweatherहवामानRainपाऊस