शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

भात पिकासाठी तण नियंत्रण करा : कृषी विभागाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 14:52 IST

भारतीय हवामान खाते, कृषी हवामान प्रभागाच्या वतीने राज्यासाठी मंगळवारी (दि. १७) कृषी सल्ला जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देपेरणी न झालेल्या ठिकाणी २० टक्के जास्त बियाणे वापरावीत

पुणे : भात पिकातील तण नियंत्रित करावे आणि अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी नत्र आणि स्फुरदच्या गोळ्या टाकाव्यात, तसेच जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी नाचणी, भुईमूग आणि सोयाबीनच्या शेतातील अतिरिक्त पाणी काढून टाकावे, असा सल्ला कृषी हवामान प्रभागाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी दिला आहे. भारतीय हवामान खाते, कृषी हवामान प्रभागाच्या वतीने राज्यासाठी मंगळवारी (दि. १७) कृषी सल्ला जाहीर करण्यात आला. खरीप पिकांची पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी करताना २० टक्के अधिक बियाणे वापरावेत असा सल्ला पुणे, सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यासाठी देण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील कापूस पट्ट्यात शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमन सापळे लावावेत. तसेच जिनिंग मिलच्या आसपासच्या २ किलोमीटर क्षेत्रातही असे सापळे लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खरीप पिके, भाजीपाला आणि फळबागांमधील अतिरिक्त पाणी चराद्वारे बाहेर काढावे असेही सुचविण्यात आले आहे. कोल्हापुर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जास्त पाऊस झालेल्या भागात नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मका आणि ऊस लागवड झालेल्या शेतातील अतिरिक्त पाणी काढून टाकावे. भात आणि नाचणी पिकाची पुर्नलागवड लवकरात लवकर करावी असा सल्ला देण्यात आला आहे. लवकर लागवड झालेल्या भात पिकामध्ये तण नियंत्रण करावे. तसेच, अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा व्हावा या साठी भात शेतात नत्र आणि स्फुरदच्या १६९ किलो गोळ्या प्रतिहेक्टर द्याव्यात, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.   

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीweatherहवामानRainपाऊस