शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

विधायक विचार पुढील पिढीला द्यायला हवे : रवींद्र सेनगावकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 18:26 IST

केवळ स्पिकर्सच्या भिंती आणि थयथयाटापेक्षा पुढील ५० वर्षे पुरतील असे विचार आजच्या पिढीला आपण द्यायला हवेत...

पुणे : समाजाला दिशा देण्याचे काम करणारे अनेक कार्यकर्ते गणेशोत्सवातून घडतात. मात्र, आजचे उत्सवाचे स्वरुप बदलत चालले आहे. बदलत्या स्वरुपाला आपण जबाबदार आहोत. केवळ उत्सवातील १० दिवसांपुरते नाही, तर वर्षभर आपण समाजासाठी खूप काही करु शकतो. त्यासोबतच देखाव्यांतून ऐतिहासिक गोष्टींना तंत्रज्ञानाची जोड देऊन चांगला संदेश देणे देखील शक्य आहे. केवळ स्पिकर्सच्या भिंती आणि थयथयाटापेक्षा पुढील ५० वर्षे पुरतील असे विचार आजच्या पिढीला आपण द्यायला हवेत, असे मत दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी व्यक्त केले. शनिपार मंडळ ट्रस्टतर्फे भक्ती गणेशाची सेवा मानवाची असे कार्य केलेल्या गडचिरोली नक्षलग्रस्त भागात केलेले सामाजिक कार्य व गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमधील नोंदीबद्दल उदय जगताप यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. कुमठेकर रस्त्यावरील सेवासदन हायस्कूल मुलींची शाळा येथे झालेल्या कार्यक्रमाला संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद पंडित, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, गोपाळ तिवारी, मंडळाचे शेखर साळुंके, प्रसाद पळसकर, गणेश घोले, संयोजक गणेश शेडगे, गोरख पळसकर यांसह कृष्णा जाधव, संदीप पाषणकर, तुषार जोरी, योगेश फाळके आदी उपस्थित होते. डॉ. देखणे म्हणाले, कार्यकर्ता घडवणारे एकमेव विद्यापीठ गणेशोत्सवाच्या रुपाने उभारले आहे. यासाठी सामाजिक जाणीवही पात्रता असून सच्चा कार्यकर्ता ही मिळणारी पदवी आहे. प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये समाजात सक्रिय व सकारात्मक बदल घडवण्याची ताकद आहे. विकृतीवर प्रकृतीची आणि त्यावर संस्कृतीची मात करण्याचे काम कार्यकर्ते करतात. त्यामुळे गणेशोत्सव नसता तर कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली नसती.प्रा.मिलिंद जोशी म्हणाले, सनदशीर मार्गाने गोष्टी मिळाल्या, तर नक्षलवाद किंवा गुन्हेगारी निर्माण होणार नाही. बुलेट नको, बुक हवेही संकल्पना अशा भागांमध्ये राबवायला हवी.उदय जगताप म्हणाले, हात उगारण्यासाठी नाही तर उभारण्यासाठी आहेत, हे ब्रीद अंगीकारुन धनकवडीतील आदर्श मित्र मंडळामार्फत आम्ही काम केले. मंडळ आपल्या खिशातील पैशाने चालवू ही संकल्पना आणून कार्यकर्त्यांना रोजगार देखील उपलब्ध करुन देण्याकरीता पुढाकार घेतला. गडचिरोलीमध्ये देखील चांगले कार्य करणा-या पोलिसांना मदतीसाठी आम्ही गेलो. गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो, ती ओळख पुसण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहेत. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.  

टॅग्स :PuneपुणेGaneshotsavगणेशोत्सवSocialसामाजिक