शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे हद्दपार करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर कटकारस्थान : शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:05 IST

- प्रस्तावित मार्गावरच हा प्रकल्प व्हावा, यासाठी जनआंदोलन उभारणार

राजगुरुनगर : पुणे-नाशिक ही देशभरातील पहिली हाय स्पीड रेल्व प्रास्तावित होती. या रेल्वे मार्गामुळे पुणे व नाशिक ही दोन्ही महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कृषी व औद्योगिक मालाच्या वाहतुकीत मोठी चालना मिळेल. मात्र, या प्रकल्पाला जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी प्रकल्प अडथळा ठरत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. प्रस्तावित मार्ग बदलून अहमदनगर मार्गे रेल्वे प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.

खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात हा मार्ग होऊ नये, यासाठी वरिष्ठ स्तरावर कटकारस्थान शिजवले जात आहे. असा खळबळजनक आरोप करून ज्या मार्गावर रेल्वे प्रकल्प प्रस्तावित आला. त्याच मार्गाने हायस्पीड रेल्वे प्रकल्प व्हावा, यासाठी जनआंदोलन उभारणार असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषेदत सांगितले.

पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प होताना तो उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात तसेच पुढे संगमनेर मार्गे सिन्नर, नाशिक असा प्रस्तावित करण्यात आला आहे. जीएमआरटी प्रकल्प बाधित होत असेल, तर नियोजित मार्गात कोणताही बदल न करता त्यावर योग्य तोडगा काढून रेल्व प्रकल्प पूर्णत्वाकडे न्यावा, या परिसरात काही अंतर दूरवरून रेल्वे मार्ग होऊ शकतो. असेही ते म्हणाले. पहिल्या सर्वेक्षणात पुणे नाशिक महामार्गाच्या पश्चिम बाजूने रेल्वेमार्ग प्रस्तावित होता.या सर्व प्रक्रियेत खोडद (ता. जुन्नर) येथील जीएमआरटीचा प्रश्न कुठेही उपस्थित झाला नव्हता. कारण, या मार्गापासून जीएमआरटी दुर आहे. नंतर पूर्व बाजूने मार्ग निश्चित करण्यात आला. संपादन झाले. शेतकऱ्यांना जवळपास चारशे कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. आत्ता जीएमआरटीवरुन हरकत घेतली जात असेल, ती एक पळवाट शोधली आहे, असे समजावे लागेल.हायस्पीड रेल्वे झाल्यास खेड, आंबेगाव आणि जुन्नर या पुणे जिल्ह्यातील तालुक्याच्या शेती विकासाला चालना मिळणार आहे. पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगांव, शिक्रापूर या औद्योगिक वसाहतीची नाशिक औद्योगिकीकरणाशी देवाणघेवाण होणार आहे. रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हायस्पीड किंवा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ प्रस्तावित मार्गावरच व्हावा, अशी येथील जनतेची आग्रही मागणी आहे. त्यासाठी मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा आढळराव पाटील यांनी दिला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा