शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

वाहनसंख्या तसेच गल्लीबोळ लक्षात घेता हेल्मेट ‘हायवे’लाच बरे : गिरीश बापट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 19:47 IST

‘‘पुण्याची एकूण वाहनसंख्या तसेच गल्लीबोळांचे स्वरूप लक्षात घेता हेल्मेट सक्ती फक्त हायवे वरच असावी असे वाटते,

ठळक मुद्देकायदा आहे, त्याचे पालन करायला हवेट्रिपल शीट, वेगमर्यादा न पाळणारे तसेच मद्यपान करून गाडी चालवणारे यांवर कारवाई हवी.’’अपघात कमी करण्याचे दुसरेही उपाय आहेत

पुणे : हेल्मेट ‘हायवे’ लाच बरे, असे मलाच नाही तर अनेकांना वाटते असे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले. पोलिस त्यांना वरिष्ठांकडून येणाऱ्या आदेशाप्रमाणे काम करतात. त्यांना अपघात कमी करायचे आहेत, मात्र त्यासाठी आणखीही उपाय आहेत. या संदर्भात आपण पोलिस आयुक्तांशी बोलू असे ते म्हणाले.

लोकसभेच्या १७ जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाला खासदार म्हणून प्रथमच उपस्थित राहण्यासाठी जाण्यापुर्वी बापट यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. त्यात हेल्मेट सक्तीचा प्रश्न उपस्थित होताच बापट म्हणाले, ‘‘पुण्याची एकूण वाहनसंख्या तसेच गल्लीबोळांचे स्वरूप लक्षात घेता हेल्मेट सक्ती फक्त हायवे वरच असावी असे वाटते, मात्र कायदा आहे, त्याचे पालन करायला हवे. युवकांकडून फारच वाईट पद्धतीने वाहने चालवली जातात, त्यातून अपघात होतात. त्यामुळेच अपघात कमी करायचे असतील तर त्यासाठी अनेक उपाय आहेत. एकेरी वाहतूकीत शिरणारे, ट्रिपल शीट जाणारे, वेगमर्यादा न पाळणारे तसेच मद्यपान करून गाडी चालवणारे अशांवर कारवाई व्हायला हवी.’’

पुण्याचे काही मोठे प्रकल्प रखडले आहेत असे स्पष्ट करून बापट म्हणाले, त्यासाठीच खासदार झाल्यानंतर लगेचच जिल्हाधिकारी, आयुक्त यांची आढावा बैठक घेतली. त्यात याविषयी चर्चा केली आहे. २४ तास पाणी योजनेच्या कामात कुचराई करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. या योजनेच्या कामाचा दर आठवड्याला अहवाल देण्याबाबत आयुक्तांना सांगितले आहे. पालखी मार्गाच्या कामाबाबतही संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. कॅन्टोन्मेट तसेच केंद्र सरकारशी संबधित असे रेल्वे, विमानतळ याबाबतचे काही प्रश्न आहेत. स्मार्ट सिटी बाबतही काही कल्पना आहेत. या सर्व गोष्टींचा आता सातत्याने आढावा घेत राहून अधिकाऱ्यांना कार्यप्रवण केले जाईल. काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 

 

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटPoliceपोलिस