शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

नैसर्गिक जलस्रोताचे संवर्धन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 7:05 AM

जागा आरक्षित करण्याची मागणी; बावधनमध्ये होणार जलपूजन

पाषाण : माणसांना नद्यांशी जोडा आणि ओढ्यांना हृदयाशी, हे ब्रीद घेऊन बावधन परिसरात नदी पात्रातील नैसर्गिक प्रवाह पुनरुज्जीवन करण्यात येत आहेत. त्यामुळे एक नवी जलचळवळ उभी राहत आहे. नैसर्गिक जलस्रोतांवर आरक्षण टाकून ते संरक्षित करावेत, अशी मागणी जलप्रेमींनी केली आहे.पुणे शहरातील बावधन परिसरातून राम नदी वाहते. एकेकाळी शुद्ध, सदानीरा असणारी राम नदी आता मरणासन्न अवस्थेत आहे. तिला पुन्हा जिवंत करायचे असेल तर तिचे संरक्षक कवच असणारे ओढे-नाले जिवंत केले पाहिजेत आणि झरे कायमस्वरूपी सुरक्षित केले पाहिजेत. असाच एक जिवंत झरा आणि बावधन ओढाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी सामान्य माणसाला जिवंत झऱ्याशी जोडू या मोहीम सुरू करण्यात आली.बावधनमधील ओढ्यातील भर उन्हाळ्यात आजसुद्धा प्रतिदिन १ लाख लिटर आणि वर्षाला साडेतीन कोटी लिटर पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध जिवंत झºयातून मिळत आहे. त्यामुळे त्याचे पुनरुज्जीवन आणि संरक्षण करण्यासाठी मागील वर्षभर प्रयत्न करण्यात आले असून या पाण्याच्या प्रवाहांना शासनाने आरक्षित करावे व त्यांना ऐतिहासिक ठेव्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. बावधन गावात नैसर्गिकरित्या उपलब्ध झालेल्या जलस्रोताचे अतिक्रमण व प्रदूषणापासून संरक्षण व संवर्धन करण्यासाठी या बाबतीत गेल्या वर्षांपासून पुणे महानगरपालिका आयुक्त व महापौर, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय संचालक, केंद्रीय भूजल मंडळ, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्याशी ईमेल तसेच पत्राद्वारे संपर्क साधला आहे, पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकाराने उत्तर आलेले नाही, असे जलप्रेमींनी सांगितले. यावर्षी जलपूजन करून पुन्हा बावधनमधील सर्व नागरिक मिळून असा स्वच्छ जिवंत पाण्याचा झरा बंद होण्यापासून व प्रदूषणापासून सुरक्षित करण्यासाठी स्थानिक नगरसेवक व शासनाला आवाहन करणार आहेत.रामनदी जलकलश पूजन उद्यागेल्या वर्षी जलमंदिर कल्पना साकारून या झºयाचे पूजन करण्यात आले. नदी पात्रातील झरे शोधून नागरी सहभागातून स्वच्छ करण्यात येत आहेत. २२ एप्रिल रोजी रामनदी जलकलश पूजा करून हा हजारो नागरिकांची तहान भागवेल अशा स्वच्छ जिवंत पाण्याचा झरा बंद होण्यापासून व प्रदूषणापासून सुरक्षित करण्याचा प्रयत्न नगरसेवक, गावकरी, विविध संस्थांनी केला आहे.जलस्रोत बंद होऊ नये म्हणून केलेल्या मागण्या...जलस्रोताच्या आसपासची जागा संगनमताने आरक्षित करणे गरजेचे आहे.जिवंत तीन स्रोत वाचवण्यासाठीचे अनुभवी जल तज्ज्ञ, भूगर्भशास्त्र तज्ज्ञांची कमिटीच्या सल्ल्यानुसार काम केले तर हा जल स्रोत नक्कीच पिढ्यान्पिढ्या स्वच्छ पाणी देत राहील. तीन हजार नागरिक या पाण्याचा वापर करतात. ते याच पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्याचे संवर्धन होणेआवश्यक आहे. शासन स्तरावर ओढे व झरे यांचा रामनदी प्रश्नावर अभ्यास करणे गरजेचे आहे.नैसर्गिक ‘जलदेवता’ मंदिर संकल्पनानिसर्गाच्या कुशीत आकाशातून पडलेला पावसाचा थेंब वाहून जाऊ नये किंवा त्याचे बाष्पीकरण होऊ नये म्हणून धरणीमातेने आपल्या उदरामध्ये जपून ठेवला. त्यानंतर संपूर्ण वर्षभर १२० ते १४० लिटर प्रतिमिनिट म्हणजेच जवळजवळ एक लाख लिटर प्रतिदिन या जलस्रोतातून पाणी मिळते. हे पाणी टेस्टिंग करून पिण्यालायक आहे, याची खात्री करून घेतली आहे. अशा नैसर्गिकरित्या जलप्रदान करणाºया ‘नैसर्गिक जलदेवता मंदिरांचे’ संरक्षण करणे गरजेचे आहे, असे जलप्रेमींनी सांगितले. जलदेवता मंदिर म्हणजे झरा होय.

टॅग्स :Waterपाणी