शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही

By राजू इनामदार | Updated: November 12, 2024 21:20 IST

'विदेशी गुलामगिरीची मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला'

राजू इनामदार

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपूर्ण देशात का लागू नव्हते ते काँग्रेसने सांगावे. आता आम्ही ३७० कलम काढल्यानंतर ते परत लागू करा असा प्रस्ताव काँग्रेसने केला. मागील ७० वर्षे पाकिस्तानची जी भाषा होती तीच आता काँग्रेसची झाली आहे असा हल्ला चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील प्रचारसभेत काँग्रेसला लक्ष्य केले. यापूर्वीच्या पुण्यातील लोकसभा प्रचारसभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भटकती आत्मा असे म्हणणाऱ्या मोदी यांनी या सभेत मात्र पवार यांच्यावर एक शब्दही काढला नाही.

विधानसभा निवडणुकीतील पुणे व सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या ३१ उमेदवारांच्या प्रचारार्थ स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा झाली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, उदयनराजे भोसले, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व महायुतीचे ३१ उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून, ‘पुण्यातील लाडक्या बहिणींनो व भावांनो, माझा नमस्कार’ अशी मराठीतून भाषणाला सुरूवात करत मोदी यांनी त्यानंतर मात्र काँग्रेसवर तिखट शब्दांमध्ये हल्ला चढवला.

मोदी म्हणाले, काँग्रेसने कर्नाटकमध्ये निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. तिथे दररोज घोटाळे समोर येत आहेत. जनतेकडून लुटलेला पैसा काँग्रेस महाराष्ट्रातील निवडणुकीत वापरत आहेत. डॉ. आंबेडकर यांचे संविधान संपूर्ण देशात का लागू केले नाही याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. आम्ही देशातील १४० कोटी जनतेच्या पाठिंब्याने ३७० कलम जमिनीत गाडले. काँग्रेसने ते परत लागू करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर केला आहे. ते आता पाकिस्तानची भाषा बोलत आहेत.विदेशी गुलामगिरीची मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला अशी टीका मोदी यांनी केली. हिंमत असेल तर त्यांनी युवराजांच्या तोंडून वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांची प्रशंसा करून दाखवावी असे आव्हानही त्यांनी दिले. सत्तेकरता काँग्रेसने कायम तुष्टीकरणाचा खेळ खेळला. आताही ते दलित, आदिवासी मागासवगर्यीय यांची एकजूट तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्यापासून सावध रहायला हवे. ते तुम्हाला कमकुवत करतील व नंतर आरक्षण काढून घेतील. एक रहेंगे तो सेफ रहेंगे अशी घोषणाही मोदी यांनी दिली.

महायुती आहे तरच राज्याची गती व प्रगती आहे. राज्यात अनेक ठिकाणी फिरलो, सगळीकडे जनतेचा पाठिंबा मिळत आहे. पुण्यात येतानाही लोक रस्त्यावर उभे राहून अभिवादन करत होते. आगामी काळात महायुती सरकार राज्यात वेगाने विकासकामे करेल. पुण्यालाही त्याचा चांगला फायदा होईल. देशातील नागरिकांच्या आकांक्षा हाच आमच्या कामाचा आधार आहे. महायुतीच्या आधीच्या सरकारकडे सांगण्यासारखे काहीच नाही, त्यामुळे ते त्यावर बोलू शकत नाही असे मोदी म्हणाले.

जम्मू कश्मिरसाठीचे आम्ही रद्द केलेले कलम पुन्हा रागू करण्याचा प्रस्ताव करणाऱ्या काँग्रेसला दिवा दाखवण्याची गरज आहे असे म्हणत मोदी यांना श्रोत्यांना मोबाईलची लाईट लावण्याचे आवाहन केले. श्रोत्यांनी त्याप्रमाणे मोबाईलची बॅटरी सुरू करताच संपूर्ण मैदान उजळून निघाले. मोदी यांनी ३६ मिनिटे भाषण केले. संपूर्ण भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शऱ्द पवार) पक्षाचे अध्यक्ष शऱद पवार यांच्यावर एका शब्दाचीही टीका केली नाही. त्याची चर्चा लगेचच सभास्थळी सुरू झाली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसPuneपुणे