शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

कर्नाटकमध्ये काँग्रेसने आर्थिक स्थिती बिघडवली; डॉ. अश्वत्थ नारायण यांचा आरोप

By राजू हिंगे | Updated: November 14, 2024 17:14 IST

राज्यात विकास ठप्प झाला असून, काँग्रेस सरकारमधील आमदार देखील अस्वस्थ झाले आहेत

पुणे : महाराष्ट्रात निवडणूक होत असून, काँग्रेसने वेगवेगळी आश्वासने जनतेला दिली आहेत. पण, गेल्या १८ महिन्यांपासून काँग्रेस सरकार कर्नाटकमध्ये असून, त्यांनी राज्याची आर्थिक स्थिती बिघडवली आहे. अनेक भ्रष्टाचार, घोटाळे देखील होताना दिसत आहेत. अवैधरीत्या भूखंड बळकावणे आणि त्यानंतर गवगवा झाल्यावर परत केले जातात. यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील सहभागी आहेत, असा आरोप कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण यांनी पत्रकार परिषदेत केला.             

डॉ. अश्वत्थ नारायण म्हणाले, तेलंगणा निवडणुकीसाठी कर्नाटक सरकारने ८७ कोटी रुपये बेकायदेशीर हस्तांतरित केल्याची घटना उघडकीस आली आहे. काँग्रेस भ्रष्टाचारात बुडालेले असून, महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी कर्नाटक सरकारचे पैसे वापरले जात आहेत. राज्यात विकास ठप्प झाला असून, काँग्रेस सरकारमधील आमदार देखील अस्वस्थ झाले आहेत.

तेलंगणात महालक्ष्मी योजनेस काँग्रेसकडून हरताळ : डी.के. अरुणा

तेलंगणामध्ये काँग्रेसने निवडणूक वेळी सहा गॅरंटी जनतेस दिल्या. शेतकऱ्यांना दोन लाख रुपये कर्जमाफी घोषणा केली. शेतकरी आणि कामगार यांना आर्थिक साह्य करू सांगितले. महिलांना दर महिना २५०० रुपये देऊ. अशी महालक्ष्मी योजना सांगितली. प्रत्येक महाविद्यालयीन तरुणीस इलेक्ट्रिक दुचाकी देऊ म्हणाले. बेरोजगार भत्ता देऊ असे सांगितले. पण, कोणत्याही आश्वासनाची पूर्तता सत्तेत आल्यापासून ११ महिन्यांत केली नाही. तरी मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात जाऊन आश्वासने पूर्ण केल्याचा खोटा प्रचार करत आहे, असे तेलंगणाच्या खासदार डी.के. अरुणा यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसBJPभाजपा