शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

कार्यकर्तेच दाखवतील काँग्रेसला पुन्हा ‘अच्छे दिन ’ : सोनल पटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 21:29 IST

तळागाळात काम करणारा कार्यकर्ता ही काँग्रेसची खरी शक्ती आहे. त्यांच्याकडे थोडे दुर्लक्ष झाले होते, त्याचा तोटा काँग्रेसला झाला...

ठळक मुद्देपश्चिम महाराष्ट्रात चांगले संघटनपक्षाच्या वतीने दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार

पुणे : तळागाळात काम करणारा कार्यकर्ता ही काँग्रेसची खरी शक्ती आहे. त्यांच्याकडे थोडे दुर्लक्ष झाले होते, त्याचा तोटा काँग्रेसला झाला, मात्र आता ते पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आले असून थेट अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडूनच तळातील कार्यकर्त्यांना शक्ती देण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेले १५ दिवस पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. त्यात अनेकांबरोबर संवाद झाला आहे व पक्ष पुन्हा चैतन्याने संघटीत होईल असा विश्वास काँग्रेस कमिटी नियुक्त पश्चिम महाराष्ट्राच्या निरीक्षक सोनल पटेल यांनी लोकमत बरोबर बोलताना व्यक्त केला.काँग्रेस महासमितीने पटेल यांची पश्चिम महाराष्ट्राकरता निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. गेले पंधरा दिवस त्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘काँग्रेस खरी मोठी झाली ती कार्यकर्त्यांमुळेच. नेत्यांनी दिलेली दिशा कार्यकर्तेच तळापर्यंत पोहचवतात. स्वातंत्र्यलढ्यापासून व नंतरही दीर्घकाळपर्यंत ही प्रक्रिया पक्षात सुरू होती. मात्र गेल्या काही वर्षात काही कारणांनी त्यात खंड पडला. कार्यकर्ता दुर्लक्षित झाला. आता मात्र असे होणार नाही. पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्या लक्षात ही त्रुटी आली आहे. त्यामुळेच त्यांनी देशाच्या सर्व राज्यातील सर्व विभागांमध्ये थेट महासमितीकडून काहीजणांना नियुक्त केले आहे. त्यातून माझी नियुक्ती झाली आहे.’’दौºयात आलेल्या अनुभवांबाबत बोलताना पटेल म्हणाल्या, ‘‘सोलापूर ,सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणच्या ब्लॉक अध्यक्षांपासून ते जिल्हाध्यक्षांपर्यंत सर्वांबरोबर बोलणी झाली. त्यानंतर या सर्व ठिकाणच्या साध्या कार्यकर्त्यांचीही भेट झाली. या भागात पक्षाचे संघटन चांगले आहे. युवकही पक्षाकडे आकर्षित झाले आहेत. त्यांच्यासाठी आता पक्षाच्या वतीने दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात देशासमोरच्या समस्या, त्यावर कसे बोलायचे, कधी बोलायचे, नागरिकांशी कसा संपर्क साधायचा याबाबत माहिती दिली जाईल. त्यात्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, पक्षाचे प्रवक्ते त्यांना मार्गदर्शन करतील.’’काही भागात पक्षाचे संघटन कमी झाले आहे. त्या ठिकाणी बदल केले जातील असे स्पष्ट करून पटेल म्हणाल्या, ‘‘प्रदेश शाखेबरोबर त्यासंदर्भात बोलणी केली जातील. आमचा अहवाल थेट काँग्रेस महासमितीला जाणार असला तरी प्रदेश पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यासही सांगण्यात आले आहे.  राहूल गांधी पक्षात पुर्वीचे वैभव नक्की आणतील असे त्यांनी संघटनेबाबत उचलेल्या पावलांवरून स्पष्ट दिसते आहे. जे असेल ते स्पष्ट बोला, त्याशिवाय बदल होणार नाही असे त्यांचे सांगणे आहे व त्यातूनच पक्ष पुन्हा सत्तास्थानी विराजमान होईल. ’’

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेस