शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

'व्यर्थ न हो बलिदान' मोहिमेतून काँग्रेस देणार भाजपाला प्रत्युत्तर; पुण्यातील टिळक वाड्यातून १ ऑगस्टला सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 15:41 IST

भाजपाकडून वारंवार होणाऱ्या टीकेला काँग्रेसकडून स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर दिले जाणार आहे.

पुणे : भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. भाजपकडून काँग्रेसवर निशाणा साधताना ७० वर्षात काय केले असा सवाल देखील उपस्थित करण्यात येतो. मात्र, भाजपच्या टीकेला काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार आहे. भारतीय जनता पार्टीकडून वारंवार होणाऱ्या टीकेला काँग्रेसकडून स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर दिले जाणार आहे. या राज्यव्यापी मोहिमेची सुरूवात १ ऑगस्टला टिळक वाड्यात होत आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी उपस्थित असतील. प्रदेश सरचिटणीस अँड. अभय छाजेड व विनायक देशमूख या मोहिमेचे राज्य समन्वयक आहेत. १ ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्यपूर्व व त्यानंतर पुढे वर्षभर स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास जनतेसमोर मांडत ही मोहीम राज्यात राबवण्यात येणार आहे. 'व्यर्थ न हो बलिदान' असे मोहिमेचे नामकरण करण्यात आले आहे.

पटोले यांनी 'लोकमत' बरोबर बोलताना सांगितले की काँग्रेस, नेहरू गांधी परिवार यावर जी प्रसन्न टीका केली जात आहे. त्याला जनता उत्तर देईलच. आमचा उद्देश नव्या पिढीसमोर काँग्रेसचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग, स्वातंत्र्योत्तर काळात देश उभारणीत असलेले काँग्रेसचे, काँग्रेस नेत्यांचे योगदान याचा इतिहास मांडायचा आहे.

टिळक वाड्यात १ ऑगस्टला सुरुवात होईल. त्यादिवशी पुण्यातील काँग्रेसच्या जून्या घराण्यांच्या वारसांना बोलावण्यात येणार आहे. राज्यातील १५ हजारपेक्षा जास्त स्वातंत्र्य सैनिकांची नावे, पत्ते तालुकानिहाय वेगळे करण्यात आले आहेत. पक्षाचे तालुकाध्यक्ष तिथे जाऊन त्यांचा गौरव करतील. 

स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेसचे फैजपूर अधिवेशन, आष्टी चिमूरचा लढा, नंदुरबारच्या शिरीषकुमारचे बलिदान, गवालिया टँक, अशा काही वैशिष्ट्यपूर्ण घटना व ठिकाणे आहेत. राज्यातील अशा ६ ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आपापल्या कार्यक्षेत्रात स्वातंत्र्य चळवळीशी संबधित छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करणार आहेत.

स्वातंत्र्य दिनापर्यंत चळवळीचा इतिहास व त्यानंतर पुढे वर्षभर स्वातंत्र्यानंतरची देश ऊभारणी अशा दोन स्तरात मोहिमेची रचना आहे. १५ ऑगस्टनंतर पुढे वर्षभर पक्षाच्या वतीने राज्याच्या सर्व जिल्हा व तालुक्यांमध्ये ही मोहिम राबवण्यात येणार आहे. व्याख्याने, प्रदर्शने, असे कार्यक्रम यात होतील.

नव्या पिढीसमोर काँग्रेसचा इतिहास येणं गरजेचं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आम्ही ही संधी घेत आहोत. स्वातंत्र्य चळवळीत कसलाही सहभाग नव्हता. त्यांनाही यानिमित्ताने याची माहिती मिळेल.नाना पटोले- प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण