शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
5
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
6
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
7
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
8
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
10
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
11
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
12
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
13
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
14
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
15
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
16
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
18
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
20
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...

'व्यर्थ न हो बलिदान' मोहिमेतून काँग्रेस देणार भाजपाला प्रत्युत्तर; पुण्यातील टिळक वाड्यातून १ ऑगस्टला सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 15:41 IST

भाजपाकडून वारंवार होणाऱ्या टीकेला काँग्रेसकडून स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर दिले जाणार आहे.

पुणे : भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. भाजपकडून काँग्रेसवर निशाणा साधताना ७० वर्षात काय केले असा सवाल देखील उपस्थित करण्यात येतो. मात्र, भाजपच्या टीकेला काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार आहे. भारतीय जनता पार्टीकडून वारंवार होणाऱ्या टीकेला काँग्रेसकडून स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर दिले जाणार आहे. या राज्यव्यापी मोहिमेची सुरूवात १ ऑगस्टला टिळक वाड्यात होत आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी उपस्थित असतील. प्रदेश सरचिटणीस अँड. अभय छाजेड व विनायक देशमूख या मोहिमेचे राज्य समन्वयक आहेत. १ ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्यपूर्व व त्यानंतर पुढे वर्षभर स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास जनतेसमोर मांडत ही मोहीम राज्यात राबवण्यात येणार आहे. 'व्यर्थ न हो बलिदान' असे मोहिमेचे नामकरण करण्यात आले आहे.

पटोले यांनी 'लोकमत' बरोबर बोलताना सांगितले की काँग्रेस, नेहरू गांधी परिवार यावर जी प्रसन्न टीका केली जात आहे. त्याला जनता उत्तर देईलच. आमचा उद्देश नव्या पिढीसमोर काँग्रेसचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग, स्वातंत्र्योत्तर काळात देश उभारणीत असलेले काँग्रेसचे, काँग्रेस नेत्यांचे योगदान याचा इतिहास मांडायचा आहे.

टिळक वाड्यात १ ऑगस्टला सुरुवात होईल. त्यादिवशी पुण्यातील काँग्रेसच्या जून्या घराण्यांच्या वारसांना बोलावण्यात येणार आहे. राज्यातील १५ हजारपेक्षा जास्त स्वातंत्र्य सैनिकांची नावे, पत्ते तालुकानिहाय वेगळे करण्यात आले आहेत. पक्षाचे तालुकाध्यक्ष तिथे जाऊन त्यांचा गौरव करतील. 

स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेसचे फैजपूर अधिवेशन, आष्टी चिमूरचा लढा, नंदुरबारच्या शिरीषकुमारचे बलिदान, गवालिया टँक, अशा काही वैशिष्ट्यपूर्ण घटना व ठिकाणे आहेत. राज्यातील अशा ६ ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आपापल्या कार्यक्षेत्रात स्वातंत्र्य चळवळीशी संबधित छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करणार आहेत.

स्वातंत्र्य दिनापर्यंत चळवळीचा इतिहास व त्यानंतर पुढे वर्षभर स्वातंत्र्यानंतरची देश ऊभारणी अशा दोन स्तरात मोहिमेची रचना आहे. १५ ऑगस्टनंतर पुढे वर्षभर पक्षाच्या वतीने राज्याच्या सर्व जिल्हा व तालुक्यांमध्ये ही मोहिम राबवण्यात येणार आहे. व्याख्याने, प्रदर्शने, असे कार्यक्रम यात होतील.

नव्या पिढीसमोर काँग्रेसचा इतिहास येणं गरजेचं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आम्ही ही संधी घेत आहोत. स्वातंत्र्य चळवळीत कसलाही सहभाग नव्हता. त्यांनाही यानिमित्ताने याची माहिती मिळेल.नाना पटोले- प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण