शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

'महाआघाडीसाठी कॉंग्रेस 'तैय्यार' पण प्रकाश आंबेडकरांकडूनच होतेय टाळाटाळ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 08:18 IST

कॉंग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी चव्हाण शुक्रवारी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी आले होते

पुणे (प्रतिनिधी) : बहुजन वंचित विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी करण्यासाठी कॉंग्रेस तयार आहे. पण ते आमच्या प्रस्तावावर टाळाटाळ करत असल्याचे दिसून येते. आंबेडकरांचा नक्की गेम प्लॅन काय आहे हेच अद्याप समजत नाही, असा आरोप काँंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

कॉंग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी चव्हाण शुक्रवारी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँंग्रेस पक्ष देशभरात निरनिराळ्या पक्षांशी आघाडी करीत आहे. राज्यातसुद्धा छोट्या-मोठ्या पक्षांबरोबर आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीला मिळू नये, हा या मागचा प्रमुख उद्देश आहे. २०१४ ची लोकसभा निवडणूक आम्ही वेगवेगळी लढल्याने आमचे नुकसान झाले होते. यावेळी ते टाळण्याचा आमचा प्रयत्न असल्यानेच आंबेडकरांना सहभागी करुन घेण्यासाठी आमंत्रित करत आहोत. पण त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत.

राज्यात शिवसेना आणि भाजपाची युती होणार याची आपल्याला खात्री होती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे काही बिघडणार नाही. पण त्यामुळे सगळ्यात मोठे प्रश्नचिन्ह उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत निर्माण होते. चार वर्ष ज्यांच्या विरोधात सतत बडबड केली त्यांच्याशी संगत करण्याची वेळ ठाकरे यांच्यावर का आली हे कोडे आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.पाकिस्तानचे काही होणार नाहीपाकिस्तानचा बाजार किंवा पाणी बंद करुन काहीही होणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानचे पाणी बंद करु ही केलेली घोषणासुद्धा हास्यापद आहे. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्याने आपण अशा प्रकारे पाणी बंद करुच शकत नाही. अशा प्रश्नांवर तडकाफडकी निर्णय घेता येत नाहीत.-पृथ्वीराज चव्हाणराज्यात शिवसेना आणि भाजपाची युती होणार याची आपल्याला खात्री होती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे काही बिघडणार नाही. पण त्यामुळे सगळ्यात मोठे प्रश्नचिन्ह उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत निर्माण होते. चार वर्ष ज्यांच्या विरोधात सतत बडबड केली त्यांच्याशी संगत करण्याची वेळ ठाकरे यांच्यावर का आली हे कोडे आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :congressकाँग्रेसPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण