शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Congress : काँग्रेसची आता विधानसभा मतदारसंख्येवर हरकत

By राजू इनामदार | Updated: January 8, 2025 19:40 IST

प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार: अ.भा. काँग्रेस समितीचे निवडणूक आयोगाला पत्र  

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्याच्या एकूण प्रौढ लोकसंख्येपेक्षा तब्बल १६ लाख जास्त मतदार असल्याची हरकत अखिल भारतीय काँग्रेस समितीने आता निवडणूक आयोगावर घेतली आहे. पक्षाचे केंद्रीय महासचिव प्रमोद चक्रवर्ती यांनी यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिले असून त्यात यासंदर्भात आयोगाने खुलासा करावा अशी मागणी केली आहे.

चक्रवर्ती यांनी म्हटले आहे की आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या लोकसंख्येवरील राष्ट्रीय आयोगाच्या नोव्हेंबर २०१९ च्या अहवालाच्या पृष्ठ क्रमांक २२९ वर, २०२४मध्ये महाराष्ट्राची अंदाजे प्रौढ (१८ ) लोकसंख्या ९.५४ कोटी इतकी मोजली जाऊ शकते, जी पाच वर्षांच्या अंदाजांवर आधारित आहे. प्रत्यक्षात निवडणूक आयोगाच्या नोंदींनुसार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण ९.७० कोटी मतदार नोंदणीकृत होते. म्हणजेच नरेंद्र मोदी सरकारच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येपेक्षा १६ लाख अधिक मतदारांची नोंदणी निवडणूक आयोगाने केल्याचे दिसते.

इतर राज्यांमधील मतदार नोंदणीची आकडेवारी लक्षात घेतली तर असे दिसते की आयोगाकडून कितीही प्रयत्न झाले तरी एकूण मतदारसंख्येच्या जास्तीतजास्त ९० टक्के मतदारांची नोंदणी केली जाऊ शकतो. असे असताना महाराष्ट्रात मात्र आयोगाने प्रत्यक्षातील प्रौढ मतदारसंख्येच्या नोंदणीपेक्षाही तब्बल १६ लाख मतदारांची जास्त नोंदणी केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसने, एकूण मतदार, झालेले मतदान, त्याची तफावत असलेली आकडेवारी अशा अनेक हरकती घेतल्या, मात्र आयोगाने त्यापैकी कशाचाच समाधानकारक खुलासा केलेला नाही. लोकशाहीच्या आणि मतदारांच्या विश्वासाला बळकटी देण्यासाठी आयोगाने किमान या वाढलेल्या मतदार नोंदणीचा तरी खुलासा करावा अशी मागणी चक्रवर्ती यांनी आयोगाकडे केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक 2024