शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची देशात आजची मतांची टक्केवारी इतर कोणत्याही विरोधी पक्षापेक्षा जास्त - पृथ्वीराज चव्हाण

By राजू इनामदार | Updated: March 31, 2023 18:26 IST

देशात विरोधक एकत्र आल्यास भाजपचा पराभव होईल

पुणे: देशातील राजकीय स्थिती असाधारण आहे ही वस्तूस्थिती मान्य करायला हवी. राहूल गांधीविरोधात ज्याप्रकारे कारवाई झाली तो प्रकार राजकीय षडयंत्राचाच आहे. देशातील या विषयावर विरोधकांचे ऐक्य करणे काँग्रेसलाच शक्य आहे, मात्र ते लक्षात घेऊनच त्यांनी थोडा समजूदारपणा दाखवायची गरज आहे असे मत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

राहूल गांधी यांच्या समर्थनासाठी जाहीर केलेल्या संकल्प यात्रेची माहिती देण्यासाठी चव्हाण काँग्रेसभवनमध्ये आले होते. पत्रकार परिषद झाल्यानंतर लोकमत बरोबर विशेष संवाद साधताना त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. काँग्रेसची देशात आजची मतांची टक्केवारी इतर कोणत्याही विरोधी पक्षापेक्षा जास्त आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये ऐक्य करण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घ्यायला हवा. मात्र त्यासाठी काँग्रेसने थोडा समजतूदारपणाही दाखवायला हवा असे चव्हाण म्हणाले.म्हणजे काय? असे विचारले असता चव्हाण म्हणाले, “असे ऐक्य सुरू झाले की लगेचच नेतृत्व कोणी करायचे असा मुद्दा पुढे येतो व त्यावरून सगळे फिसकटते. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वालाही तेच हवे आहे. विरोधक एकत्र झाले त्यांचा पराभव होतो. याचे अगदी नेमके उदाहरण पुणे जिल्ह्यातील कसबा व चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात नुकतेच दिसले. कसब्यात एकाचएक उमदेवार होता तर काँग्रेसचा विजय झाला, चिंचवडमध्ये तसे झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. तिथे विरोधकांमधील दोन्ही पराभूत उमेदवारांची मतांची बेरिज विजयी उमेदवाराच्या मतांच्या पुढे आहे.”

समजूतदारपणा म्हणजे काय यावर चव्हाण यांनी विरोधकांच्या ऐक्य प्रक्रियेत नेतृत्वाचा मुद्दाच उपस्थित करू नये असे मत व्यक्त केले. ते म्हणाले, “काँग्रेसने याबाबतीत दोन पावले मागे यायला हवे, तसेच अन्य विरोधकांनाही या गोष्टीचा आग्रह धरू नये. आधी भाजपचा पराभव, ते ज्या पद्धतीने सरकार चालवत आहेत, त्याचा पराभव हे मुख्य उद्दीष्ट आहे. जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेसच्या विरोधात असे ऐक्य यशस्वी करून दाखवले. त्यावेळेसही विरोधकांमध्ये कोणा एकाचे नेतृत्व नव्हते. सामुहिकपणे सगळे नेते नेतृत्व करत होते. त्यामुळे आता त्याचीच पुनरावृत्ती आवश्यक आहे.”

काँग्रेसमध्येच जीवंतपणा दिसत नाही या थेट प्रश्नावर चव्हाण म्हणाले, ''असे बाहेरून पाहणाऱ्यांना वाटते. देशातील असाधारण राजकीय परिस्थितीची पहिली जाणीव काँग्रेसलाच झाली. त्याविरोधात पहिला आवाजही काँग्रेसनेच उठवला आहे. आजही देशात काँग्रेस हाच तळागाळातील राष्ट्रीय पक्ष आहे. मात्र याचाच अर्थ त्यांनीच सतत आघाडीवर असावे असा होत नाही. उलट त्यांनी समंजसपणा दाखवावा अशी इतरांची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. ते ओळखून काँग्रेसने पावले टाकावीत. आम्ही तसेच सुचवत असतो. आता देश, राज्य, जिल्हा तसेच गावस्तरावर संकल्प यात्रांचे आयोजन जाहीर केले आहे. यातही विरोधकांना सहभागी करून घ्यायचा विचार सुरू आहे. यात्रानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक होणार आहे.''

टॅग्स :PuneपुणेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार