शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सरकारची फक्त घोषणाबाजी : थावरचंद गेहलोत यांची टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 18:23 IST

2014 पर्यंत मागील सरकारने दिव्यांगांसाठी केवळ 52 कॅम्प घेतले अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत काँग्रेसवर टीका केली. 

ठळक मुद्देकेंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत काँग्रेसवर टीकामहाराष्ट्रात दिव्यांगांसाठी 3 टक्के आरक्षण असून, वाढवण्याचा विचार करावा :थावरचंद गेहलोत

पुणे :   काँग्रेस सरकारने केवळ घोषणाबाजी करत प्रत्यक्ष काम केले नाही. दिव्यांगांना मोफत उपकरण वाटपाची योजनेला 1992 ला सुरवात झाली आहे. तेव्हापासून 2014 पर्यंत मागील सरकारने दिव्यांगांसाठी केवळ 52 कॅम्प घेतले अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत काँग्रेसवर टीका केली. आजवर सत्तेत असलेल्यांनी गरीब हटाओ नारा दिला मात्र, प्रत्यक्ष काम केले नाही. यामुळे गरीब - श्रीमंतामधील दरी वाढतच गेली. अशा परिस्थितीत मोदी सरकारने गरीब, दिव्यांगांसाठी महत्वपुर्ण निर्णय घेऊन त्यांना प्रवाहात आणण्याचे काम केले असेही ते म्हणाले. सामाजिक न्याय मंत्रालयाच्यावतीने गणेश कला क्रीडा मंच याठिकाणी सामाजिक अधिकारीता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात  1 हजार 152 दिव्यांग व्यक्तींना 1 हजार 758 उपकरणांचे वाटप करण्यात आले.    

     केंद्राने सरकारी नोकरीत 4 टक्के आरक्षण दिले आहे. तर प्रशासनात दिव्यांगांचा सहभाग वाढून ते स्वावलंबी होण्यासाठी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याने महत्वपुर्ण निर्णय घेत हे आरक्षण 6 टक्के केले आहे. महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी 3 टक्के आरक्षण असून त्यांनी देखील वाढवण्याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. एखाद्या कार्यालयात कामानिमित्त गेल्यावर आत जाण्यासाठी स्वतंत्र सुगम मार्ग, जिना, स्वच्छतागृह, रॅम्प, व्हिलचेअर आदींची सोय असावी यासाठी सुगम्य भारत अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्रात 180 इमारतींची निवड करण्यात आली आहे तर 142 इमारतीठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाGovernmentसरकारministerमंत्रीcongressकाँग्रेस