शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

काँग्रेस सरकारची फक्त घोषणाबाजी : थावरचंद गेहलोत यांची टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 18:23 IST

2014 पर्यंत मागील सरकारने दिव्यांगांसाठी केवळ 52 कॅम्प घेतले अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत काँग्रेसवर टीका केली. 

ठळक मुद्देकेंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत काँग्रेसवर टीकामहाराष्ट्रात दिव्यांगांसाठी 3 टक्के आरक्षण असून, वाढवण्याचा विचार करावा :थावरचंद गेहलोत

पुणे :   काँग्रेस सरकारने केवळ घोषणाबाजी करत प्रत्यक्ष काम केले नाही. दिव्यांगांना मोफत उपकरण वाटपाची योजनेला 1992 ला सुरवात झाली आहे. तेव्हापासून 2014 पर्यंत मागील सरकारने दिव्यांगांसाठी केवळ 52 कॅम्प घेतले अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत काँग्रेसवर टीका केली. आजवर सत्तेत असलेल्यांनी गरीब हटाओ नारा दिला मात्र, प्रत्यक्ष काम केले नाही. यामुळे गरीब - श्रीमंतामधील दरी वाढतच गेली. अशा परिस्थितीत मोदी सरकारने गरीब, दिव्यांगांसाठी महत्वपुर्ण निर्णय घेऊन त्यांना प्रवाहात आणण्याचे काम केले असेही ते म्हणाले. सामाजिक न्याय मंत्रालयाच्यावतीने गणेश कला क्रीडा मंच याठिकाणी सामाजिक अधिकारीता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात  1 हजार 152 दिव्यांग व्यक्तींना 1 हजार 758 उपकरणांचे वाटप करण्यात आले.    

     केंद्राने सरकारी नोकरीत 4 टक्के आरक्षण दिले आहे. तर प्रशासनात दिव्यांगांचा सहभाग वाढून ते स्वावलंबी होण्यासाठी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याने महत्वपुर्ण निर्णय घेत हे आरक्षण 6 टक्के केले आहे. महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी 3 टक्के आरक्षण असून त्यांनी देखील वाढवण्याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. एखाद्या कार्यालयात कामानिमित्त गेल्यावर आत जाण्यासाठी स्वतंत्र सुगम मार्ग, जिना, स्वच्छतागृह, रॅम्प, व्हिलचेअर आदींची सोय असावी यासाठी सुगम्य भारत अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महाराष्ट्रात 180 इमारतींची निवड करण्यात आली आहे तर 142 इमारतीठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाGovernmentसरकारministerमंत्रीcongressकाँग्रेस