शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 17:05 IST

पुणे अपघातावरून अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपाला अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलं आहे.

Ajit Pawar ( Marathi News ) : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघात प्रकरणावरून दिवसागणिक नवनवे आरोप-प्रत्यारोप होत आहे. अपघात घडल्यानंतर अजित पवार यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला होता. त्यामुळे त्यांचा फोन जप्त करून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. दमानिया यांच्या या आरोपाला अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलं असून याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना देण्यासाठी मी आयुक्तांना फोन केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पुणे अपघातावरून होत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, "मी लोकप्रतिनिधी आहे आणि राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. एखादी घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर ती घटना पुणे शहरातील असेल तर इथल्या पोलीस आयुक्तांना, पिंपरी चिंचवडमधील असेल तर तेथील आयुक्तांना आणि ग्रामीणची घटना असेल तर पोलीस अधीक्षकांना फोन करून सूचना देत असतो. कारण ते पोलीस यंत्रणेचे प्रमुख असतात. आम्ही शिपायाला, पीआयला किंवा एपीआयला फोन करण्याचा संबंध नाही. कारण आयुक्त त्या यंत्रणेचे प्रमुख असतात, म्हणून आम्ही त्यांनाच फोन करतो. तुम्ही सगळेजण मला ओळखता, अशा घटना घडल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की मी कोणालाही पाठीशी घालत नाही. उलट कधी-कधी तर मी म्हणतो तिथं अजित पवार दोषी असेल तर त्यांच्यावरही कारवाई करा. त्यामुळे या घटनेतही मी आयुक्तांना सांगितलं की, कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य ती कारवाई करा. कारण श्रीमंताच्या घरचा मुलगा असल्यामुळे दबाव येण्याची शक्यता होती, तसंच आर्थिक आमिष दाखवले जाण्याची शक्यता होती. अशा आमिषाला बळी न पडता कारवाई करावी, अशा सूचना मी दिल्या होत्या," असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

"अजित पवारांचा फोन जप्त करा आणि त्यांचा राजीनामा घ्या"

पुण्यातील अपघातात पोलिसांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा करत अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. "पुण्यातील अपघातानंतर अख्खी पोलीस यंत्रणा आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती. या पोलिसांना कोणीतरी सूचना दिल्याचा मला संशय होता आणि आता अनेक रिपोर्ट्स बघितल्यानंतर लक्षात येत आहे की अजित पवारांनीच त्यांना फोन केला असावा. कारण फक्त आमदार सुनील टिंगरे यांच्या सांगण्यावरून पुण्याचे पोलीस आयुक्त आरोपीला वाचवणार नाहीत. त्यामुळे अजित पवारांनी आयुक्तांना असा फोन केला होता का, याची चौकशी व्हावी. यासाठी त्यांचा फोन जप्त करण्यात यावा आणि मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घ्यावा," अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारanjali damaniaअंजली दमानियाPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघात