शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीने घातली तुटीत भर

By admin | Updated: July 6, 2015 05:26 IST

प्रवाशांना सक्षम बससेवा मिळावी यासाठी २००७ मध्ये पीएमटी व पीसीएमटी या परिवहन उपक्रमांचे एकत्रीकरण करण्यात आले.

राजानंद मोरे, पुणेप्रवाशांना सक्षम बससेवा मिळावी यासाठी २००७ मध्ये पीएमटी व पीसीएमटी या परिवहन उपक्रमांचे एकत्रीकरण करण्यात आले. मात्र, या एकत्रीकरणानंतर अस्तित्वात आलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) बस अजूनही अडखळतच धावत आहे. तोट्यात चाललेल्या या सेवेमुळे प्रवाशांना चांगली सुविधा देणे तर दूरच, अनेकदा कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचाही प्रश्न निर्माण होताना दिसतो. पीएमटी व पीसीएमटीला स्थापनेपासून २००७ पर्यंत झालेल्या ४० ते ५० वर्षांतील संचलन तुटीची सरासरी पीएमपीने २००७ ते १४ या सात वर्षांतच गाठली आहे. त्यामुळे कंपनी अस्तित्वात आल्यानंतर ती पांढरा हत्ती ठरत आहे. एप्रिल २००७ पूर्वी पुणे व पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांसाठी स्वतंत्र परिवहन उपक्रम चालविले जात होते. पीएमटी व पीसीएमटीच्या बस दोन्ही शहरांतील प्रवाशांना सेवा पुरवीत होत्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी २००७ मध्ये हे दोन्ही उपक्रम एकत्र करून ‘पीएमपी’ची स्थापना करण्यात आली. मात्र, त्यानंतर आजतागायत ‘पीएमपी’ कधीही कंपनी म्हणून उभी राहू शकली नाही. दरवर्षी वाढत जाणाऱ्या तोट्यामुळे ती अधिक कमकुवत होत चालली आहे. दोन्ही महापालिकांच्या अनुदानाच्या कुबड्यांवरच ‘पीएमपी’ला मार्गावर यावे लागत आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या नेमणुकीतील अडथळ्यांची शर्यत, घटती प्रवासी संख्या, व्यवस्थापन, समन्वय व नियोजनातील अभाव, पैशांअभावी बंद पडलेल्या बस अशा विविध कारणांमुळे पीएमपीची संचलन तूट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पीएमपीतून मिळालेल्या माहितीनुसार, १९५१ ते २००७ या कालावधीत पीएमटीची तूट सुमारे १९६ कोटी २६ लाख रुपये होती, तर १९७४ ते २००७ या कालावधीत पीसीएमटीची तूट ५७ कोटी ७९ लाख रुपये एवढी होती. तर २००६-०७ या वर्षात अनुक्रमे ८४९ व २१२ बस अस्तित्वात होत्या. एप्रिल २००७ मध्ये पीएमपी ही कंपनी अस्तित्वात आल्यानंतर मार्च २०१४ पर्यंत तब्बल २५५ कोटी ३४ लाख रुपयांची तूट आहे. २०१३-१४ मध्ये बसेसची संख्या १४५१ एवढी होती. मागील वर्षभरात बसेसची संख्या सुमारे ६०० ने वाढली असती तरी तूट मात्र कमी झालेली नाही.व्यवस्थापन आणि नियोजनाचा अभावकंपनी होऊनही पीएमपीकडून प्रवाशांना चांगली सेवा मिळत नाही. त्याप्रमाणे बस ताफ्यातही उल्लेखनीय वाढ झालेली नाही. व्यवस्थापन व नियोजनाचाही मोठा अभाव दिसतो. त्यामुळे प्रवासी संख्येबरोबरच उत्पन्नही वाढविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. अद्याप सेवकवर्गाची आस्थापना, सेवाजेष्ठता यादी तसेच सेवक संख्येचे प्रमाण तयार करण्यात आलेले नाही. दोन्ही पूर्व उपक्रमांच्या आस्थापनेनुसारच सेवकांची पदे अस्तित्वात आहेत. कंपनी निर्माण झाल्यानंतर स्वबळावर आगारांची उभारणी, बसताफा वाढविणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण, मार्गांचे पुनर्नियोजन, प्रवासीसंख्येत वाढ करण्यात प्रशासन असमर्थ ठरले आहे. एकत्रीकरणाचा फेरविचार करा ४पीएमटी व पीसीएमटीचे एकत्रीकरण करूनही तूट वाढत असल्याने याचा फेरविचार करावा, अशी मागणी पीएमटी कामगार संघ (इंटक) या कामगार संघटनेने पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. संघटनेचे सरचिटणीस नुरुद्दीन इनामदार, कार्याध्यक्ष रामचंद्र पवार, उपाध्यक्ष अशोक जगताप, सहचिटणीस उल्हास बनकर व विकास देशमुख यांनी चार दिवसांपूर्वीच बापट यांच्याकडे हे गाऱ्हाणे मांडले. संघटनेच्या या मागणीवर पालकमंत्रीही सकारात्मक असल्याचे इनामदार यांनी सांगितले. पीएमटी व पीसीएमटी स्वतंत्र असताना जी दशा होती तीच कशा कंपनी अस्तित्वात आल्यानंतर आहे. ना प्रवाशांना चांगली सेवा मिळाली, ना उत्पन्न वाढले. संस्थात्मक स्वरूप बदलून दर्जेदार सेवा मिळते असा अनुभव नाही. त्यामुळे पुन्हा स्वतंत्र होऊन स्वस्त, सुरक्षित, सक्षम व भरवशाची बससेवा मिळेल, याची खात्री नाही. प्रवाशांना केवळ चांगली सेवा मिळायला हवी. मग ती पीएमपी देवो वा पीएमटी, याने काहीही फरक पडत नाही. ही सेवा कशी व कोण देणार याचे उत्तर अधिकारी व कामगार संघटनाही देत नाहीत. - जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच