शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Ajit Pawar: 'मी येथेच आहे, कोठेही पळून जाणार नाही' त्यांची चौकशी संपली कि पुराव्यानिशीच बोलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 19:42 IST

(income tax department) आयकर विभागाची चौकशी झाल्यावर पूर्ण पुराव्यानिशीच बोलणार आहे. मी येथेच आहे. कोठेही पळून जाणार नाही. तसेच मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे.

ठळक मुद्देकोणी कर बुडवू नये, म्हणून मी नागरिकांना आवाहन करत असतोकराचा हा पैसा राज्याच्या विकासासाठी वापरण्यात येतोएका साखर कारखान्यामध्ये दरवर्षी सुमारे ५०० ते ७०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते

पुणे: आयकर विभागाचे अधिकारी (पाहुणे) असा उल्लेख पाहुणे लोक थांबलेले आहेत. त्यांना आपल्याला त्रास (डिस्टर्ब) द्यायचा नाही. त्यांचा पाहुणचार झाल्यानंतर मी पुढे सगळे बोलणार आहे. ही चौकशी संपली की पूर्ण पुराव्यानिशीच बोलणार आहे. मी येथेच आहे. कोठेही पळून जाणार नाही. तसेच मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. याबाबत मला कोणतीही नोटीस आलेली नाही, अशा खरपूस शब्दात आयकर विभागाकडून होत असलेल्या कारवाईबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला.

विधानभवन येथे कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार म्हणाले, की माझी भूमिका स्वच्छ असते. मी सरळमार्गी आहे. कोणी कर बुडवू नये, म्हणून मी नागरिकांना आवाहन करत असतो. कराचा हा पैसा राज्याच्या विकासासाठी वापरण्यात येतो. त्यामुळे आर्थिक शिस्त मोडायची नाही. तर एका साखर कारखान्यामध्ये दरवर्षी सुमारे ५०० ते ७०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. काहींना साखर कारखाने चालवायला जमले नाहीत. ते कारखाने देशोधडीला लागले आहेत. काही कारखान्यांना एफआरपीची रक्कम देणे सुध्दा शक्य झाले नाही.

कोणत्याही कंपनीवर धाडी टाकण्याचा ‘त्यांना’ अधिकार

आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री पवार यांचा मुलगा पार्थ तसेच नातेवाईकांच्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी दुसऱ्या दिवशीसुध्दा सुरु आहे. आता चौकशी सुरु आहे. आयकर विभाग त्यांचे काम करत आहे. आजसुद्धा हे काम सुरु आहे. आयकर विभागाला कोणत्याही कंपनीवर धाडी टाकण्याचा अधिकार आहे. यामध्ये काय योग्य आहे ? काय अयोग्य आहे ? याची ते चौकशी करतात. त्यांच्या चौकशीमध्ये मला व्यत्यय आणायचा नाही. त्यांची चौकशी झाल्यावर मी बाेलेन, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

किती कारखाने कसे विकले, कोणी विकले हे पुराव्यानिशी दाखवणार

राज्यातील एकूण किती कारखाने विकले गेले. ते कोणत्या किंमतीला विकले गेले आहेत. तसेच ते कोणी विकत घेतले. कोणामुळे विकले गेले. त्याचबरोबर त्या कारखान्याचा मालक कोण आहे. सध्या तो कारखाना कोण चालवत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या सर्व कारखान्यांची विक्री करताना नियमांचे पालन झाले की नाही. हे सर्व मी पुराव्यानिशी दाखविणार आहे, असे सांगत अजित पवार यांनी विरोधी पक्षाला आव्हान दिले आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारIncome Taxइन्कम टॅक्सGovernmentसरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेस