शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

स्पर्धा परीक्षा एक आजार ; म्हणतायेत फर्ग्युसनचे विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 14:36 IST

महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पथनाट्यातून स्पर्धा परीक्षांबाबत जागृती करण्यात येत आहे.

पुणे : स्पर्धा परीक्षा एक आजार आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याआधी इतर करिअर ऑप्शन्सकडे सुद्धा लक्ष द्या असे आवाहन पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी करत आहेत. महाविद्यालयात नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. स्पर्धा परीक्षा एक आजार असे या पथनाट्याचे नाव असून त्या द्यावारे स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली. 

पुण्यात शिक्षणासाठी राज्यातून तसेच देशभरातून विद्यार्थी येत असतात. पुण्यातील दर्जेदार शिक्षण आणि इतर साेविसुविधा यांमुळे पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा जास्त असताे. त्यातच राज्याच्या विविध भागांमधून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची माेठी क्रेझ असल्याने त्याकडेच त्यांचा अधिक ओढा असताे. आपल्या मुलाला अधिकारी म्हणून पाहण्याची पालकांची इच्छा असल्याने पालक देखील पदरमाेड करुन पाल्याला पुण्यात शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी पाठवत असतात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्लासेस तसेच वाचन कक्षांची संख्या देखील पुण्यात जास्त आहे. अनेकदा क्लासेसकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट देखील हाेत असते. सरकारी नाेकरीच्या जागा काही शे मध्ये असतात. परंतु त्यासाठी तयारी करणाऱ्यांची संख्या लाखाेंच्या घरात आहे. एकानंतर एक असे अनेक प्रयत्न विद्यार्थ्यांकडून केले जात असल्याने इतर नाेकऱ्यांसाठीचे त्यांचे वय देखील निघून जाते. अनेकदा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यामुळे डिग्रीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करतानाच त्यांना स्पर्धा परीक्षांबाबत देखील जागृती करण्याचे काम पथनाट्यातून करण्यात आले. 

पथनाट्य सादर करणारा सुनिल जाधव म्हणाला, नव्याने महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांबाबत आम्ही पथनाट्यातून प्रबाेधन करत आहाेत. फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी अनेकदा केवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करायची याचा विचार करुन प्रवेश घेत असतात. त्यामुळे त्यांचे पहिल्या दिवशी स्वागत करत असताना पथनाट्यातून प्रबाेधन देखील आम्ही करत आहाेत. आम्हाला याद्वारे विद्यार्थ्यांना सांगायचे आहे की 14 विद्या आणि 64 कला असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे या विद्यांकडे देखील विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

निवेदिता साळवे म्हणाली, ग्रामीण भागातून येणारे अनेक विद्यार्थी हे येथे येऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. ग्रामीण भागातले पालक आपल्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्रसंगी आपली जमीन देखील विकतात. परंतु अनेक प्रयत्नानंतरही विद्यार्थ्यांना यश येत नाही. त्यामुळे पथनाट्यातून आम्हाला विद्यार्थ्यांना सांगायचे आहे की इतर करिअरच्या देखील वाटा आहेत. त्याकडे देखील विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणcultureसांस्कृतिक