शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

इथेनॉल उचलण्यास कंपन्या उदासीन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 14:45 IST

इथेनॉल निर्मितीला चांगला वाव असतानाही आॅईल कंपन्यांकडून त्याकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे साखर क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. 

ठळक मुद्देअवघ्या साडेपाच कोटींची उचल : ऊसगाळप हंगाम भरात असताना ही स्थितीसाखर हंगाम ऐन भरात असताना इथेनॉलची उचल होणे आवश्यक

पुणे : आॅईल कंपन्यांकडून इथेनॉलचा पुरवठा करण्याबाबत कोट्यवधीचा कोटा राज्याला मंजूर झाला आहे. मात्र, आॅईल कंपन्यांकडून इथेनॉलची उचलच होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्याला ४३.७ कोटी लिटरची पर्चेस आॅर्डर मिळालेली असताना अवघ्या साडेपाच कोटी लिटर इथेनॉलची उचल कंपन्यांकडून करण्यात आली आहे. देशपातळीवर यंदा उसाचे भरघोस उत्पादन झाले आहे. त्यामुळे इथेनॉलचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी चांगली स्थिती आहे. राज्यात २२ मार्चअखेरीस ८७५.९२ लाख टन ऊसगाळपातून ९७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. आॅईल कंपन्यांनी ३१३.५७ कोटी लिटरच्या खरेदीची निविदा प्रसिद्ध केली. त्यानंतर निवादा अंतिम होण्यात आणि इथेनॉल उत्पादकांना खरेदी मागणी आणि पुरवठ्यासंबंधीचे राज्य उत्पादनशुल्कची परवानगी घेण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागला. परिणामी, राज्यातील उत्पादकांना ४३.३७ कोटी लिटर इथेनॉलपुरवठा करण्याची पर्चेस आॅर्डर मिळाली. गेल्या ३ महिन्यांत आॅईल कंपन्यांनी ११ कोटी लिटर इथेनॉलची उचल करणे आवश्यक होते; पण २६ फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत केवळ ५.४६ कोटी लिटरचीच उचल केली. आॅईल कंपन्यांच्या सर्व डेपोंवर इथेनॉलचे टँकर रिकामे होण्यास तब्बल ७ ते ८ दिवसांचा कालावधी लागत आहे.आॅईल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदीबाबत उदासीनता असल्याचे दिसून येते. साखर हंगाम ऐन भरात असताना इथेनॉलची उचल होणे आवश्यक असते. याच काळात इथेनॉल उचलण्यास विलंब केला जात असल्याचे राज्य सहकारी साखर संघातील सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी २०१६-१७ या हंगामात राज्यात अवघे ३७३.१३ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यामुळे मळीच्या उत्पादनात घट झाली होती. तसेच, त्या वेळी आॅईल कंपन्यांनीदेखील इथेनॉलचा दर ३९ रुपये प्रतिलिटर जाहीर केला होता. त्यामुळे गेल्या हंगामात अवघ्या ८.३४ कोटी लिटरच्या निविदा अंतिम झाल्या होत्या. परिणामी, गेल्या हंगामात २०१५-१६च्या तुलनेत अवघा २० टक्के कोटाच भरला गेला होता. यंदा इथेनॉलचा दर ४०.८५ रुपये प्रतिलिटर इतका असून, इथेनॉलवरील स्थानिक संस्था कर व अबकारी कर रद्द झालेला आहे. तसेच, या हंगामात सुमारे साडेनऊशे लाख टनांवर ऊसगाळपाचा अंदाज आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीला चांगला वाव असतानाही आॅईल कंपन्यांकडून त्याकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे साखर क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने