शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

Pune MIDC fire:आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन; कंपनीचा मालक पुण्यातून ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 21:30 IST

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची घोषणा

मुळशी तालुक्यातील उरवडे येथील केमिकल कंपनीला लागलेली आगीची घटना दु:खद आहे. या घटनेत एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली आहे. सध्या कुलींगचे काम सुरू आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे तपासण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समितीची नेमण्यात आली आहे. यात चीफ फायर ऑफीसर, एमआयडीसीचे अधिकारी, महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्डाचे अधिकारी तसेच पोलिसांचा समावेश आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. घटनास्थळी पीएमआरडीएचे अधिकारी आणि पोलिस अधिकारीही उपस्थित होते. कंपनीत प्लॅस्टिकच्या रॅपरिंगचे काम सुरू असताना शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. तपासानंतरच नेमकी आग कशामुळे लागली हे स्पष्ट होणार आहे. यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. कंपनीचे मालक निकुंज शहा यांना त्यांच्या पुण्यातील घरातून ताब्यात घेण्यात आहे आहे. कंपनीला अचानक आग लागल्याने स्थानिकांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अग्निशामक दलाचे बंदही तेथे आले. मात्र, रस्ते लहान असल्याने गाड्यांना आता जाता आले नाही. यामुळे जेसीबीच्या साह्याने कंपनीची भिंग फोडून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. रात्री उशीरा पर्यंत आग विझवण्याचे कार्य सुरू होते.

टॅग्स :fireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलFire Brigadeअग्निशमन दल