शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आयुक्तांना लाज वाटायला पाहिजे, कारवाईवरुन मनसेच्या रुपाली पाटलांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 17:21 IST

स्थानिक नगरसेवकांची ही जबाबदारी आहे, त्यानंतर महापौरांनी लक्ष घालून आयुक्तांना सांगून कारवाई तात्काळ थांबवायला पाहिजे होती. जर, महापालिकेतील भाजपा सरकारने याकडे दुर्लक्ष केले तर, महाविकास आघाडी सरसकारने लक्ष द्यायला हवे होते

ठळक मुद्देआयुक्तांना लाज वाटायला पाहिजे, सकाळपासून फोन उचलत नाहीत, त्यांची नैतिक जबाबदारी आहे की फोन उचलून कारवाई थांबवली पाहिजे, असे म्हणत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

पुणे - पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमणे हटविण्याला गुरुवारी सकाळपासून सुरुवात झाली. यावेळी नागरिकांनी आक्रमक रूप धारण करत या कारवाईला जोरदार विरोध केला. महापालिका न्यायालयाने या कारवाईला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. हनुमंत फडके यांनी या संदर्भात महापालिका न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीची सुनावणी झाली. मात्र, या घटनेनंतर प्रशासन आणि नेतेमंडळींविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. मनसेच्या रुपाली पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन आयुक्तांसह राजकीय नेत्यांवर प्रहार केला आहे.  

स्थानिक नगरसेवकांची ही जबाबदारी आहे, त्यानंतर महापौरांनी लक्ष घालून आयुक्तांना सांगून कारवाई तात्काळ थांबवायला पाहिजे होती. जर, महापालिकेतील भाजपा सरकारने याकडे दुर्लक्ष केले तर, महाविकास आघाडी सरसकारने लक्ष द्यायला हवे होते. मात्र, सगळ्यांची मिलीभगत आहे, बिल्डरशी सगळ्यांचे लागेबांदे आहेत, असा आरोप मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला आहे. गोरगरीब लोकांची ही वस्ती आहे, अनेकांच्या अनेक समस्या आहेत, लहान मुलं, बाळांतीण आई, लोकांचा आक्रोश, कष्टकरी लगेच कुठं जाणार?, ही लोकं स्थलांतरीत व्हायला तयार आहेत, असे रुपाली पाटील यांनी म्हटले. 

आयुक्तांना लाज वाटायला पाहिजे, सकाळपासून फोन उचलत नाहीत, त्यांची नैतिक जबाबदारी आहे की फोन उचलून कारवाई थांबवली पाहिजे, असे म्हणत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. सुप्रिम कोर्टाचे काही आदेश आहेत, त्यानुसार कोरोना व सद्यस्थिती अशी कारवाई करता येत नाही. पण, राजकारणाची पातळी अत्यंत खालावल्याचं या घटनेवरुन दिसून येतं. लोकांचा तळतळाट घेऊ नका, कोरोनानंतरही असलं राजकारण करु नका, असेही पाटील यांनी म्हटले. 

न्यायालयाच्या आदेशात या भागातील कुटुंब विस्थापित होणार आहे. त्यांच्या पुनर्वसनाचं न्यायालयासमोर नाही. अशावेळी नागरिकांना उध्वस्त करणे उचित ठरणार नाही. जोपर्यंत या नागरिकांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईला स्थगिती देत आहोत असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कारवाई दरम्यान सुरू झालेला नागरिक व प्रशासन यांच्यातला तीव्र संघर्ष तात्पुरता संपण्याची शक्यता आहे. पुण्यातील आंबील ओढ्याजवळचा कारवाईला विरोध करणाऱ्या १०० नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात झाली होती.

टॅग्स :MNSमनसेPuneपुणेMayorमहापौरBJPभाजपा