शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पुणे शहर वाहतूक शाखेच्या कारवाईला पोलीस आयुक्तांचा 'जॅमर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 12:57 IST

खंडणीचा गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता...

पुणे : वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराच्या तक्रारी वाढल्याने स्वत: पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी जॅमर लावला आहे. पुढील आदेश येईपर्यंत सर्व प्रकारच्या टोईंगची कारवाई व रस्त्यावरील पावत्या फाडणे थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहतूक पोलीस फक्त वाहतुकीचे नियमन करण्याकडे लक्ष देतील, असे आदेश काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांविषयी आलेल्या तक्रारींची चौकशी विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडे सोपविण्यात आली असून त्यात जे दोषी आढळून येतील, त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांनी दिलेला आदेश

* रस्त्यावरील कोणतेही वाहन पुढील आदेशापर्यंत टोईंग वाहनाद्वारे उचलले जाणार नाही.

* रस्त्यावर ज्या केसेस केल्या जातात. त्या पुढील आदेश येईपर्यंत कुठलीही पावती केली जाणार नाही.

* जर वाहतुकीला अडथळा येत असेल, वाहनचालकाने रस्त्यामध्येच गाडी लावली असेल तर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते आपल्या परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांना पाठवून त्यांच्या परवानगीने असे वाहन टोईंग करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा.

* वाहतूक पोलिसांवर टीका होत असल्याने त्याची खात्री करण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांना पाठविण्यात येणार आहे. अशावेळी काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

* वाहतूक शाखेविषयी आलेल्या तक्रारींची चौकशी विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या प्राथमिक चौकशीत जे आढळून येईल, त्यानुसार टोईंग चालक, मालक किंवा वाहतूक पोलीस यांच्यापैकी कोणावर खंडणीचा गुन्हा दाखल करायचा हे निश्चित करण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक शाखेच्या सर्व पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त आणि उपायुक्त यांची बैठक घेऊन संपूर्ण शाखेची झाडाझडती घेतली. नागरिकांच्या तक्रारी येता कामा नयेत. या तक्रारीत तथ्य आढळून आल्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी सर्वांना दिला.

रस्त्यावरील पोलीस गायब

वाहतूक शाखेच्या पोलिसांना कारवाई न करता फक्त वाहतूक नियमन करण्याचे आदेश दिल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून चौकाचौकांत घोळक्याने उभे असलेले वाहतूक पोलीस अचानक गायब झाल्यासारखे झाले आहेत. नेहमी चौकाच्या एका बाजूला दबा धरून बसून डाव्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना पकडणारे पोलीस दिसत नव्हते. सातारा रोडवर दिवसभर वाहतूक असते; पण शनिवारी तसेच रविवारीही या रस्त्यावर अरणेश्वर चौक वगळता कात्रजपर्यंत सायंकाळच्या वेळी एकही वाहतूक पोलीस दिसला नाही. शहराच्या अनेक चौकात हीच परिस्थिती दिसून आली.

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिस