शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या पाण्यावरची टीका : ‘त्यांच्या’ तोंडाला कुलूप का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:41 IST

लसंपदामंत्री गिरीश महाजन पुणेकरांच्या पाण्यावर वारंवार तोंडसुख घेत असताना पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, खासदार तोंडाला कुलूप लावून का बसले आहेत, असा सवाल सजग नागरिक मंचाने उपस्थित केला आहे.

पुणे : जलसंपदामंत्री गिरीश महाजन पुणेकरांच्या पाण्यावर वारंवार तोंडसुख घेत असताना पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, खासदार तोंडाला कुलूप लावून का बसले आहेत, असा सवाल सजग नागरिक मंचाने उपस्थित केला आहे. जलसंपदात काय जळते आहे ते महाजन यांनी आधी पाहावे, असा सल्लाही मंचाने त्यांना दिला आहे. त्यांना ते आठवत नसेल तर पुण्याचे प्रतिनिधी म्हणून आमदार, खासदार यांनी त्यांना ते माहिती करून द्यावे, असे मंचाने म्हटले आहे.जलसंपदामंत्री महाजन यांनी शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा पुण्याच्या पाण्यावर टीका केली व पुणेकरांनी पाणी जपून वापरावे, असा सल्लाही दिला. त्यावर बोलताना मंचाचे पदाधिकारी विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे म्हणाले. सन १९९९ झालेला ११.५० एमएलडी पाणी वापराचा करार, २० वर्षांत पुण्याची लोकसंख्या दुपटीने वाढली तरी नव्याने करण्यात आलेला नाही. त्यात जलसंपदा विभागाला अपयश आले आहे.पुणेकरांनी अधिकाधिक सांडपाणी शुद्धीकरण करून शेतीसाठी सोडावे, असा अनाहुत सल्ला महाजन देतात, मात्र महापालिकेच्या मुंढवा येथील सांडपाणी शुद्धीकरणासाठी उभारलेल्या जॅकवेलकडे दुर्लक्ष करतात. बेबी कालव्याच्या दुरुस्तीत जलसंपदाला अपयश आल्यामुळे हा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवता येत नाही, हे महाजन यांच्या गावीही नाही.पाण्याची गळती होते, यासाठीच महापालिकेने खडकवासला येथून पर्वतीपर्यंत बंद पाइपलाइनने पाणी आणले आहे. त्यावर महाजन कधी बोलत नाहीत, मात्र खडकवासला ते इंदापूर या मुठा उजव्या कालव्यातून होणारी ४० टक्के गळती थांबवण्यात त्यांच्या खात्याला अपयश आले, हेही ते कधी सांगत नाहीत.किती ठिकाणी : ते अपयशी झाले...पुण्याच्या पाण्याचे आॅडिट व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या महाजन यांनी प्रथम आपल्या खात्याचा अभ्यास करावा व किती ठिकाणी ते अपयशी झाले आहेत, त्याची माहिती घ्यावी, असे वेलणकर म्हणाले. महाजन पुणेकरांच्या पाण्यावर अशी अप्रत्यक्ष टीका करीत असताना पुण्याचे लोकप्रतिनिधी म्हणवणारे आमदार, खासदार मात्र तोंडाला कुलूप लावून बसले आहेत, अशी खंत वेलणकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणेwater scarcityपाणी टंचाई