शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी एकत्र यावे : मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 21:15 IST

शिक्षण, विज्ञान आणि संशोधन यांच्या समन्वयातून विद्यार्थी निर्माण करावयाचे आहेत.

ठळक मुद्देएमआयटीत छात्र संसदेचा घंटानाद 

पुणे: ‘वाढत जाणाऱ्या दहशतवादी घटनांना थोपविण्यासाठी जगातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन त्याचा नायनाट करावा लागेल. तरच जगातील सर्व नागरिक सुखी व समाधानी होतील. वसुधैव कुटुंबकमची शिकवण देणारा भारत हा संपूर्ण विश्व आपले मानतो.’असे प्रतिपादन केंद्र्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केले.भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या वतीने विज्ञान भवन नवी दिल्ली येथे २० ते २३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत १० व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या करीता कोथरूड येथील एमआयटी कॅम्पसवर लोकशाहीचा घंटानाद डॉ. निशंक यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.यावेळी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड,कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू प्रा.डॉ.एन.टी.राव, प्र-कुलगुरू प्रा.डी.पी. आपटे व भारतीय छात्र संसदेचा राष्ट्रीय समन्वयक विराज कवाडिया, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्टुडंट कौन्सिलचा अध्यक्ष अविनाश टेंबे व जनरल सक्रेटरी हिमांशू चौधरी उपस्थित होते.शिक्षण, विज्ञान आणि संशोधन यांच्या समन्वयातून शिक्षण देऊन असे विद्यार्थी निर्माण करावयाचे आहेत,असे नमूद करून निशंक म्हणाले,‘आपल्या नेतृत्व गुणांच्या आधारे संकटांवर मात करतील असे विद्यार्थी घडविणे हाच केंद्र्र सरकारचा मुख्य उद्देश आहे. तरूणांनी स्वप्ने पहायला शिकावे आणि त्यांना सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करावा. भारत हा विश्व गुरू असून तो पुढेही राहणारच. त्याकरीता तरूणांचा सहभाग महत्वाचा आहे.’

टॅग्स :PuneपुणेmitएमआयटीTerrorismदहशतवादCentral Governmentकेंद्र सरकार