शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

जिल्हाधिकारी करणार दुष्काळी स्थितीची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 02:13 IST

जिल्हाधिकारी नवल किशोर राम स्वत: शिरूर तालुक्यापासून दुष्काळी भागाच्या पाहणीला सुरूवात करणार आहेत.

पुणे : जिल्ह्यातील दहा तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती असल्याचे राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले असून, जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक तालुक्याचा गावनिहाय अहवाल घेतला जात आहे. परंतु, जिल्हाधिकारी नवल किशोर राम स्वत: शिरूर तालुक्यापासून दुष्काळी भागाच्या पाहणीला सुरूवात करणार आहेत.मराठवाड्यासह विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. तसेच, राज्यात परतीचा पाऊसच पडला नाही. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामांतील पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्षांच्या वतीने करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यात आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर व वेल्हे या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे चित्र आहे. त्यातच जिल्ह्यातील मावळ, मुळशी व खेड हे तालुके सोडून इतर दहा तालुक्यांमधील स्थिती गंभीर आहे. इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर या तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जुन्नर तालुक्यात सरासरीच्या १२७ टक्के पाऊस झाला असला, तरी पावसात सातत्य नसल्याने तालुक्यातील भातपीक वाया गेले आहे.दुष्काळी गावांच्या यादीमध्ये आपल्या गावाचाही समावेश केला जाणार का? याबाबत काही शेतकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे तालुका स्तरावरील संघटना व लोकप्रतिनिधींकडून जिल्हाधिकाºयांना दुष्काळी स्थितीची माहिती दिली जात आहे. सोमवारी जुन्नर भागातील नागरिकांनी दुष्काळी स्थितीचे छायाचित्र जिल्हाधिकाºयांना सुपूर्त केले. तसेच, धरण परिसर सोडून इतर भागातील पिकांची पहाणी करून जुन्नरमधील गावांचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये सभावेश करावा, या मागणीचे निवेदन दिले.नवल किशोर राम म्हणाले, ‘‘जिल्हा प्रशासनातर्फे दुष्काळी स्थितीची माहिती संकलित केली जात असून प्रत्येक तालुक्याचा गावनिहाय आढावा घेतला जात आहे. तालुक्यात पडलेला पाऊस आणि पिकांची स्थिती यांचा तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडून अहवाल जमा केला जात आहेत. तसेच. नोव्हेंबरमध्ये दुष्काळाची पाहणी करणार आहे.दुष्काळावर जिल्हाधिकाºयांशी चर्चामाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन जिल्हातील दुष्काळी स्थितीवर चर्चा केली. प्रत्येक तालुक्यातील पावसाची स्थिती तपासावी. तसेच, टँकरची मागणी असणाºया भागात तत्काळ टँकर सुरू करावेत, अशी मागणी पवार यांनी केली.

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणे