शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जिल्हाधिकारी करणार दुष्काळी स्थितीची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 02:13 IST

जिल्हाधिकारी नवल किशोर राम स्वत: शिरूर तालुक्यापासून दुष्काळी भागाच्या पाहणीला सुरूवात करणार आहेत.

पुणे : जिल्ह्यातील दहा तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती असल्याचे राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले असून, जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक तालुक्याचा गावनिहाय अहवाल घेतला जात आहे. परंतु, जिल्हाधिकारी नवल किशोर राम स्वत: शिरूर तालुक्यापासून दुष्काळी भागाच्या पाहणीला सुरूवात करणार आहेत.मराठवाड्यासह विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. तसेच, राज्यात परतीचा पाऊसच पडला नाही. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामांतील पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्षांच्या वतीने करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यात आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर व वेल्हे या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे चित्र आहे. त्यातच जिल्ह्यातील मावळ, मुळशी व खेड हे तालुके सोडून इतर दहा तालुक्यांमधील स्थिती गंभीर आहे. इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर या तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जुन्नर तालुक्यात सरासरीच्या १२७ टक्के पाऊस झाला असला, तरी पावसात सातत्य नसल्याने तालुक्यातील भातपीक वाया गेले आहे.दुष्काळी गावांच्या यादीमध्ये आपल्या गावाचाही समावेश केला जाणार का? याबाबत काही शेतकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे तालुका स्तरावरील संघटना व लोकप्रतिनिधींकडून जिल्हाधिकाºयांना दुष्काळी स्थितीची माहिती दिली जात आहे. सोमवारी जुन्नर भागातील नागरिकांनी दुष्काळी स्थितीचे छायाचित्र जिल्हाधिकाºयांना सुपूर्त केले. तसेच, धरण परिसर सोडून इतर भागातील पिकांची पहाणी करून जुन्नरमधील गावांचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये सभावेश करावा, या मागणीचे निवेदन दिले.नवल किशोर राम म्हणाले, ‘‘जिल्हा प्रशासनातर्फे दुष्काळी स्थितीची माहिती संकलित केली जात असून प्रत्येक तालुक्याचा गावनिहाय आढावा घेतला जात आहे. तालुक्यात पडलेला पाऊस आणि पिकांची स्थिती यांचा तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडून अहवाल जमा केला जात आहेत. तसेच. नोव्हेंबरमध्ये दुष्काळाची पाहणी करणार आहे.दुष्काळावर जिल्हाधिकाºयांशी चर्चामाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन जिल्हातील दुष्काळी स्थितीवर चर्चा केली. प्रत्येक तालुक्यातील पावसाची स्थिती तपासावी. तसेच, टँकरची मागणी असणाºया भागात तत्काळ टँकर सुरू करावेत, अशी मागणी पवार यांनी केली.

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणे