शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

"गेल्या १० वर्षांत २०१९ हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्रात..."; CM देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 10:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षात महाराष्ट्राची विकासाची दिशा कशी असेल याबाबत भाष्य केले आहे

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ हे वर्ष मोठी उलथापालथ घडवणारं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पडली. त्यानंतर महाविकास आघाडीची निर्मिती होऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झालं. या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कारभार पाहिला. मात्र २०१९ स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला जून २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुंग लावला.  त्यामुळे २०१९ हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात महत्त्वाचं ठरलं. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ हे वर्ष आलं नसतं महाराष्ट्रात चित्र वेगळं असतं असं विधान केलं आहे.

सकाळला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षात महाराष्ट्राची विकासाची दिशा कशी असेल हे सांगितले. तसेच उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचे स्थान कुठं आहे यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका मांडली. महाराष्ट्रात २०२२ नंतर विकासाला गती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कुणी थांबवू शकणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

२०१४ ते २०२४ या १० वर्षांच्या काळामध्ये माझ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय म्हणतात तसं झालं आहे. मी कधी मंत्रीही झालेलो नसताना थेट मुख्यमंत्री झाल्याने 'हा काही करू शकेल की नाही?' या विचाराने २०१४ मध्ये लोक माझ्याकडे संशयाने बघायचे. पाच वर्षांच्या पूर्ण कार्यकाळानंतर मी आता पुन्हा मुख्यमंत्री झालो आहे. तेव्हा लोकांनी मी काय करू शकतो, किंवा माझी क्षमता काय, ते अनुभवले आहेत. एक व्यक्ती म्हणूनही अनेक आव्हानांचा सामना केल्याने परिपक्वता आली आहे. आता मला आव्हानांची चिंता वाटत नाही. आव्हानं पेलतांना आपला अजेंडा ढळू द्यायचा नाही. आपल्या अजेंड्यावर चालत राहायचं, असा माझा प्रयत्न असणार आहे. गेल्या १० वर्षांत २०१९ हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्र वेगाने पुढे गेला असता. २०१९ ते २०२२ या कालावधीत विकासाला खीळ बसली होती. २०२२ नंतर आपण पुन्हा विकासाला गती दिली आहे. आता दाव्याने हे सांगतो आहे की महाराष्ट्राला कुणी थांबवू शकणार नाही, असा विकसित महाराष्ट्र पाहण्यास मिळेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर १०० दिवसांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामध्ये प्रशासनाने त्यांचे सादरीकरण करून ते काय करणार हे मांडले आहे; तसेच नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सात कलमी कार्यक्रमदेखील मांडलेला आहे. या १०० दिवसांच्या उदिष्टांवर राज्य सरकारच्या पुढील पाच वर्षाच्या कामाची दिशा स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील प्रशासकीय घड़ी ही चांगली आहे. फक्त त्यांच्याकडून काम करून घेणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता होती. प्रशासनाकडून कसे काम करून घ्यायचे, हे गेल्या १० वर्षांत नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. दिल्लीत आता ठग आणि दलाल सापडत नाहीत. प्रशासन लवकर नवीन बदल स्वीकारत नाही, ते बदल त्यांच्याकडून करून घ्यावे लागतात," असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र