शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

वातावरणाच्या बदलाने पाऊसही बदलला, भविष्यात अशा घटना वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उत्तरेकडून येणारे वारे आणि अरबी समुद्रामधून दक्षिण आणि पश्चिम दिशेने येणारे वारे यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उत्तरेकडून येणारे वारे आणि अरबी समुद्रामधून दक्षिण आणि पश्चिम दिशेने येणारे वारे यांचा मिलाफ झाला आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. जी ढगांच्या निर्मितीसाठी अनुकूल असल्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. हे वारे पूर्वेला सरकले आणि बाष्प घेऊन आले. सह्याद्रीच्या पूर्वभागेच्या ४० किमीच्या पट्ट्यांमध्ये परत त्या वाऱ्यांना उद्वगती प्राप्त झाली आणि त्या भागात चांगला पाऊस पडला. या पट्ट्यात सर्व नद्यांचे उगम आहेत. त्यामुळे धरणात पाणी जमा झाले आणि पाण्याच्या विसर्गामुळे पूरस्थिती निर्माण झाली. परंतु हे जरी तत्कालीन कारण असले तर त्यामागे वातावरणीय बदल देखील कारणीभूत आहे. पावसाचा पॅटर्न बदलल्यामुळे भविष्यात अशा घटना वाढतच जाणार आहेत, असा इशारा ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूरसह कोकणामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. कुलकर्णी यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला. ते म्हणाले, १९८० पासून वातावरणीय बदलाचा पावसावर परिणाम होत आहे. २६ जुलै २००५ चा मुंबई प्रलय सर्वांना परिचित आहे. आता पाऊस हा दक्षिण भागापुरताच सीमित राहू लागला आहे. उत्तर भागात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी आहे. फक्त मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि आंध्र प्रदेशातील तेलंगणामध्ये व कर्नाटकात पाऊस जास्त आहे. वातावरणीय बदल, उतरेकडून तत्कालीन येणारे वारे यांचाही हा परिणाम आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये सांगलीला पूर आला. त्यावर शासनाने वडनरे समिती नेमली होती. त्यांनी काही शिफारशी केल्या होत्या. शक्य आहे. केवळ दोन ते तीन तास आधी पूर्वसूचना देऊन उपयोग नाही. किमान बारा किंवा चोवीस तास आधी पूर्वानुमान जाहीर केले तर नुकसान टाळता येईल. नागरिकांचे स्थलांतर करणे शक्य होते आणि जीवित हानी टाळता येऊ शकते. भविष्यात वातावरणीय बदलामुळे अशा घटना वाढतच जाणार आहेत. यासाठी कृषी आणि पाण्याचे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. आत्तापासूनच त्याची तयारी होणे गरजेचे आहे.

------------------

कायमस्वरूपी यंत्रणा हवी...

वातावरणीय बदलामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी ४ किंवा ८ सेंटिमीटरने वाढणार आहे आणि हिमनद्या वितळणार आहेत एवढेच लोकांना माहिती आहे. परंतु समुद्र किनारपट्टीवरील लोकांना त्याचा त्रास होणार आहे. जमीन नापिक होणार आहे, हे पटकन लक्षात येत नाही. पण आता हे घडतंच राहाणार आहे,याकडे डॉ. कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.

-------------------------------

‘ढगफुटी’ झाली असे म्हणता येणार नाही

महाराष्ट्रातील अनेक भागात ढगफुटी झाल्याचे म्हटले जात असले तरी ढगफुटी कशाला म्हणतात तर एका तासात १०० मिलिमीटर किंवा १० सेंटिमीटर पाऊस झाला तर त्याला ढगफुटी असे म्हणता येईल. त्याचे अनुमान काढण्यासाठी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असायला हवीत. ती आपल्याकडे आहेत का याचा विचार व्हायला हवा. आपण जोरदार पाऊस झालाय असे म्हणू शकतो पण ‘ढगफुटी’ झाले असे म्हणता येणार नसल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

-----------------------------------------