शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

वातावरणाच्या बदलाने पाऊसही बदलला, भविष्यात अशा घटना वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उत्तरेकडून येणारे वारे आणि अरबी समुद्रामधून दक्षिण आणि पश्चिम दिशेने येणारे वारे यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उत्तरेकडून येणारे वारे आणि अरबी समुद्रामधून दक्षिण आणि पश्चिम दिशेने येणारे वारे यांचा मिलाफ झाला आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. जी ढगांच्या निर्मितीसाठी अनुकूल असल्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. हे वारे पूर्वेला सरकले आणि बाष्प घेऊन आले. सह्याद्रीच्या पूर्वभागेच्या ४० किमीच्या पट्ट्यांमध्ये परत त्या वाऱ्यांना उद्वगती प्राप्त झाली आणि त्या भागात चांगला पाऊस पडला. या पट्ट्यात सर्व नद्यांचे उगम आहेत. त्यामुळे धरणात पाणी जमा झाले आणि पाण्याच्या विसर्गामुळे पूरस्थिती निर्माण झाली. परंतु हे जरी तत्कालीन कारण असले तर त्यामागे वातावरणीय बदल देखील कारणीभूत आहे. पावसाचा पॅटर्न बदलल्यामुळे भविष्यात अशा घटना वाढतच जाणार आहेत, असा इशारा ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूरसह कोकणामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. कुलकर्णी यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला. ते म्हणाले, १९८० पासून वातावरणीय बदलाचा पावसावर परिणाम होत आहे. २६ जुलै २००५ चा मुंबई प्रलय सर्वांना परिचित आहे. आता पाऊस हा दक्षिण भागापुरताच सीमित राहू लागला आहे. उत्तर भागात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी आहे. फक्त मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि आंध्र प्रदेशातील तेलंगणामध्ये व कर्नाटकात पाऊस जास्त आहे. वातावरणीय बदल, उतरेकडून तत्कालीन येणारे वारे यांचाही हा परिणाम आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये सांगलीला पूर आला. त्यावर शासनाने वडनरे समिती नेमली होती. त्यांनी काही शिफारशी केल्या होत्या. शक्य आहे. केवळ दोन ते तीन तास आधी पूर्वसूचना देऊन उपयोग नाही. किमान बारा किंवा चोवीस तास आधी पूर्वानुमान जाहीर केले तर नुकसान टाळता येईल. नागरिकांचे स्थलांतर करणे शक्य होते आणि जीवित हानी टाळता येऊ शकते. भविष्यात वातावरणीय बदलामुळे अशा घटना वाढतच जाणार आहेत. यासाठी कृषी आणि पाण्याचे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. आत्तापासूनच त्याची तयारी होणे गरजेचे आहे.

------------------

कायमस्वरूपी यंत्रणा हवी...

वातावरणीय बदलामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी ४ किंवा ८ सेंटिमीटरने वाढणार आहे आणि हिमनद्या वितळणार आहेत एवढेच लोकांना माहिती आहे. परंतु समुद्र किनारपट्टीवरील लोकांना त्याचा त्रास होणार आहे. जमीन नापिक होणार आहे, हे पटकन लक्षात येत नाही. पण आता हे घडतंच राहाणार आहे,याकडे डॉ. कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.

-------------------------------

‘ढगफुटी’ झाली असे म्हणता येणार नाही

महाराष्ट्रातील अनेक भागात ढगफुटी झाल्याचे म्हटले जात असले तरी ढगफुटी कशाला म्हणतात तर एका तासात १०० मिलिमीटर किंवा १० सेंटिमीटर पाऊस झाला तर त्याला ढगफुटी असे म्हणता येईल. त्याचे अनुमान काढण्यासाठी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असायला हवीत. ती आपल्याकडे आहेत का याचा विचार व्हायला हवा. आपण जोरदार पाऊस झालाय असे म्हणू शकतो पण ‘ढगफुटी’ झाले असे म्हणता येणार नसल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

-----------------------------------------