शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

वातावरणाच्या बदलाने पाऊसही बदलला, भविष्यात अशा घटना वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उत्तरेकडून येणारे वारे आणि अरबी समुद्रामधून दक्षिण आणि पश्चिम दिशेने येणारे वारे यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : उत्तरेकडून येणारे वारे आणि अरबी समुद्रामधून दक्षिण आणि पश्चिम दिशेने येणारे वारे यांचा मिलाफ झाला आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. जी ढगांच्या निर्मितीसाठी अनुकूल असल्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. हे वारे पूर्वेला सरकले आणि बाष्प घेऊन आले. सह्याद्रीच्या पूर्वभागेच्या ४० किमीच्या पट्ट्यांमध्ये परत त्या वाऱ्यांना उद्वगती प्राप्त झाली आणि त्या भागात चांगला पाऊस पडला. या पट्ट्यात सर्व नद्यांचे उगम आहेत. त्यामुळे धरणात पाणी जमा झाले आणि पाण्याच्या विसर्गामुळे पूरस्थिती निर्माण झाली. परंतु हे जरी तत्कालीन कारण असले तर त्यामागे वातावरणीय बदल देखील कारणीभूत आहे. पावसाचा पॅटर्न बदलल्यामुळे भविष्यात अशा घटना वाढतच जाणार आहेत, असा इशारा ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूरसह कोकणामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. कुलकर्णी यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला. ते म्हणाले, १९८० पासून वातावरणीय बदलाचा पावसावर परिणाम होत आहे. २६ जुलै २००५ चा मुंबई प्रलय सर्वांना परिचित आहे. आता पाऊस हा दक्षिण भागापुरताच सीमित राहू लागला आहे. उत्तर भागात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी आहे. फक्त मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि आंध्र प्रदेशातील तेलंगणामध्ये व कर्नाटकात पाऊस जास्त आहे. वातावरणीय बदल, उतरेकडून तत्कालीन येणारे वारे यांचाही हा परिणाम आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये सांगलीला पूर आला. त्यावर शासनाने वडनरे समिती नेमली होती. त्यांनी काही शिफारशी केल्या होत्या. शक्य आहे. केवळ दोन ते तीन तास आधी पूर्वसूचना देऊन उपयोग नाही. किमान बारा किंवा चोवीस तास आधी पूर्वानुमान जाहीर केले तर नुकसान टाळता येईल. नागरिकांचे स्थलांतर करणे शक्य होते आणि जीवित हानी टाळता येऊ शकते. भविष्यात वातावरणीय बदलामुळे अशा घटना वाढतच जाणार आहेत. यासाठी कृषी आणि पाण्याचे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे. आत्तापासूनच त्याची तयारी होणे गरजेचे आहे.

------------------

कायमस्वरूपी यंत्रणा हवी...

वातावरणीय बदलामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी ४ किंवा ८ सेंटिमीटरने वाढणार आहे आणि हिमनद्या वितळणार आहेत एवढेच लोकांना माहिती आहे. परंतु समुद्र किनारपट्टीवरील लोकांना त्याचा त्रास होणार आहे. जमीन नापिक होणार आहे, हे पटकन लक्षात येत नाही. पण आता हे घडतंच राहाणार आहे,याकडे डॉ. कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.

-------------------------------

‘ढगफुटी’ झाली असे म्हणता येणार नाही

महाराष्ट्रातील अनेक भागात ढगफुटी झाल्याचे म्हटले जात असले तरी ढगफुटी कशाला म्हणतात तर एका तासात १०० मिलिमीटर किंवा १० सेंटिमीटर पाऊस झाला तर त्याला ढगफुटी असे म्हणता येईल. त्याचे अनुमान काढण्यासाठी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असायला हवीत. ती आपल्याकडे आहेत का याचा विचार व्हायला हवा. आपण जोरदार पाऊस झालाय असे म्हणू शकतो पण ‘ढगफुटी’ झाले असे म्हणता येणार नसल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

-----------------------------------------