शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

दहावीची पुस्तके व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल; मुंबईत गुन्हा दाखल, प्रकाशकांकडून गैरफायदा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:01 PM

आगामी शैक्षणिक वर्षासाठी (२०१८-१९) बालभारतीकडून तयार करण्यात येत असलेली दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके व्हॉटस्अ‍ॅपवरून व्हायरल झाली आहेत.

ठळक मुद्देतपास सायबर शाखेकडून करण्यात येत असल्याचे बालभारती संचालक सुनील मगर यांनी केले स्पष्टबालभारतीकडून पुस्तके कधी बाजारात आणली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष

पुणे : आगामी शैक्षणिक वर्षासाठी (२०१८-१९) बालभारतीकडून तयार करण्यात येत असलेली दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके व्हॉटस्अ‍ॅपवरून व्हायरल झाली आहेत. गाइड, व्यवसाय माला व इतर साहित्य प्रकाशित करणाऱ्या खासगी प्रकाशकांकडून याचा गैरफायदा घेतला जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडून इयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारीत पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम सुरू आहे. यातील काही पुस्तके व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने याप्रकरणी मुंबईच्या दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर शाखेकडून करण्यात येत असल्याचे बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी स्पष्ट केले आहे.       शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर गेल्या तीन-चार दिवसांपासून इयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाचे विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे भाग एक व भाग दोन अशी दोन पुस्तके शिक्षकांच्या काही ग्रुपवर व्हायरल झाली होती. या पुस्तकफुटीचा सर्वाधिक गैरफायदा खासगी प्रकाशकांकडून उचलला जाण्याची शक्यता आहे. अधिकृत पुस्तके बाजारात येण्यापूर्वीच व्हाइरल झालेल्या पोस्टच्या आधारे त्यांच्याकडून पुस्तके बाजारात आणण्याची शक्यता आहे. त्याचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसू शकतो, अशी भीती शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर खासगी क्लासचालकही त्याआधारे विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये शिकविण्याची शक्यता नाकारता येत नाही. बालभारतीकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ही पुस्तकफुटी कशी झाली, याचा शोध घेण्यात येत आहे. सायबर शाखेकडून त्याचा तपास केला जात आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी स्पष्ट केले आहे.  

दहावीची पुस्तके लवकर बाजारात उपलब्ध व्हावीतदहावी हे बोर्डाचे वर्ष असल्याने त्याची तयारी विद्यार्थ्यांकडून नववीपासूनच केली जाते. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक या सगळ्यांचे त्याकडे लक्ष लागलेले असते. त्यामुळे बालभारतीच्या दहावी अभ्यासक्रमाच्या नवीन पुस्तकांचे काम पूर्ण झाले असल्यास त्यांनी त्याबाबत गुप्तता न बाळगता ती तातडीने बाजारात उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून झालेल्या पुस्तकफुटीमुळे निर्माण झालेला संभ्रम त्यामुळे दूर होऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बालभारतीकडून पुस्तके कधी बाजारात आणली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपcyber crimeसायबर क्राइमMumbaiमुंबईPuneपुणे