शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

दहावीची पुस्तके व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल; मुंबईत गुन्हा दाखल, प्रकाशकांकडून गैरफायदा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 12:04 IST

आगामी शैक्षणिक वर्षासाठी (२०१८-१९) बालभारतीकडून तयार करण्यात येत असलेली दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके व्हॉटस्अ‍ॅपवरून व्हायरल झाली आहेत.

ठळक मुद्देतपास सायबर शाखेकडून करण्यात येत असल्याचे बालभारती संचालक सुनील मगर यांनी केले स्पष्टबालभारतीकडून पुस्तके कधी बाजारात आणली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष

पुणे : आगामी शैक्षणिक वर्षासाठी (२०१८-१९) बालभारतीकडून तयार करण्यात येत असलेली दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके व्हॉटस्अ‍ॅपवरून व्हायरल झाली आहेत. गाइड, व्यवसाय माला व इतर साहित्य प्रकाशित करणाऱ्या खासगी प्रकाशकांकडून याचा गैरफायदा घेतला जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडून इयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारीत पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम सुरू आहे. यातील काही पुस्तके व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने याप्रकरणी मुंबईच्या दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर शाखेकडून करण्यात येत असल्याचे बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी स्पष्ट केले आहे.       शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर गेल्या तीन-चार दिवसांपासून इयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाचे विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे भाग एक व भाग दोन अशी दोन पुस्तके शिक्षकांच्या काही ग्रुपवर व्हायरल झाली होती. या पुस्तकफुटीचा सर्वाधिक गैरफायदा खासगी प्रकाशकांकडून उचलला जाण्याची शक्यता आहे. अधिकृत पुस्तके बाजारात येण्यापूर्वीच व्हाइरल झालेल्या पोस्टच्या आधारे त्यांच्याकडून पुस्तके बाजारात आणण्याची शक्यता आहे. त्याचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसू शकतो, अशी भीती शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर खासगी क्लासचालकही त्याआधारे विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये शिकविण्याची शक्यता नाकारता येत नाही. बालभारतीकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ही पुस्तकफुटी कशी झाली, याचा शोध घेण्यात येत आहे. सायबर शाखेकडून त्याचा तपास केला जात आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी स्पष्ट केले आहे.  

दहावीची पुस्तके लवकर बाजारात उपलब्ध व्हावीतदहावी हे बोर्डाचे वर्ष असल्याने त्याची तयारी विद्यार्थ्यांकडून नववीपासूनच केली जाते. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक या सगळ्यांचे त्याकडे लक्ष लागलेले असते. त्यामुळे बालभारतीच्या दहावी अभ्यासक्रमाच्या नवीन पुस्तकांचे काम पूर्ण झाले असल्यास त्यांनी त्याबाबत गुप्तता न बाळगता ती तातडीने बाजारात उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून झालेल्या पुस्तकफुटीमुळे निर्माण झालेला संभ्रम त्यामुळे दूर होऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बालभारतीकडून पुस्तके कधी बाजारात आणली जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपcyber crimeसायबर क्राइमMumbaiमुंबईPuneपुणे