शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पुण्यात कृषी सेवा केंद्र, खते, बियाणे व कीटकनाशक दुकाने दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 20:36 IST

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश ; हाॅटस्पाॅट ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार....

पुणे : मान्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असून, ग्रामीण भागात मान्सूनपूर्व शेती कामांना वेग आला आहे. परंतु सध्या जिल्ह्यात असलेल्या लाॅकडाऊन व वेळेच्या मर्यादेमुळे शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून अखेर बुधवार(दि.19) पासून शहर आणि जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र, खते, बि-बायाणे व कीटकनाशके,औषधांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान हाॅटस्पाॅट गावांतील दुकानाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येईल असे देखील देशमुख यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणी पूर्व तयारी ची कामे देखील सुरू केली आहेत. शेतकऱ्यांना बी बियाणे आणि रासायनिक खते देण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी ग्रामीण भागातील खते बी-बियाणे आणि कीटकनाशकांची दुकाने आता दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी राहतील.सध्या हाय अलर्ट आणि हॉटस्पॉट नसलेल्या गावांमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी दुकाने उघडी ठेवण्याची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आहे. मात्र खते बी-बियाणे आणि कीटकनाशकांची दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहू शकतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले.

पुणे शहरामध्ये ही रासायनिक खते बी-बियाणे आणि कीटकनाशकांच्या दुकानांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या क्षेत्रातील दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात संदर्भातील आदेश महापालिका आयुक्तांच्या स्तरावरून काढला जाणार आहे. शेतकऱ्यांना पेरणी पूर्वतयारीसाठी बी बियाण्यांची खरेदी तसेच रासायनिक खतांचा पुरवठा तसेच खरेदी यासाठी ही वेळ वाढवण्यात आली आहे.---------शेतकऱ्यांची अडचण दूर होईल सध्या संपूर्ण जिल्ह्यात खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. परंतु लाॅकडाऊन व दुकानांच्या वेळेमुळे शेतक-यांना आवश्यक बी-बियाणे व खते मिळण्यास प्रचंड अडचण निर्माण होत होती. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना वेळेत बि-बियाणे व खते उपलब्ध होतील.- बाबुराव वायकर, कृषी सभापती जिल्हा परिषद

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीRainपाऊस