शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संक्रमित भागातील नागरिकांचा बेशिस्तपणा सुरूच : 'सोशल डिस्टन्स'चा अभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 16:13 IST

पोलिसांनी सूचना केल्यानंतर देखील नागरिकांकडून सहकार्य नाही 

ठळक मुद्देकुणी बेशिस्तपणा करून समाजाला वेठीस धरणार असेल तर त्याच्यावर कारवाई विनाकारण बाहेर पडणे, सोशल डिस्टन्स न ठेवणे यामुळे कायद्याचे उल्लंघन

पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील 22 भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय शहरातला मध्यवस्तीचा भाग, प्रमुख पेठा तसेच शहराच्या सीमेवर असणाऱ्या उपनगरातील बराचसा भाग सील करण्यात आला आहे. विशेषत: कोरोना संक्रमित भागातील नागरिकांकडून पोलिसांना सहकार्य मिळत नसल्याचे दिसून आले आहे. विनाकारण बाहेर पडणे, सोशल डिस्टन्स न ठेवणे यामुळे कायद्याचे उल्लंघन होत आहे. कसबा पेठेत अनेक नागरिक दुपारच्या वेळी गप्पा मारण्यासाठी घराबाहेर येऊन बसत असल्याचे दिसून आले आहे. अनेकजण गल्लीबोळात उभ्या असणाऱ्या रिक्षांमध्ये बसून टवाळकी करत आहेत. कुठलेही निमित्त पुढे करून ते घराबाहेर पडत आहेत. रात्रीच्या वेळी काहीजण मोबाईल वर बोलताना दिसून येत असून त्यांना पोलिसांनी सूचना देऊनही त्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. दिवसेंदिवस कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. तरीही नागरिक याची धास्ती घेत नाहीत. म्हणूनच पोलिसांनी त्या भागातील फेऱ्या वाढवल्या आहेत. दाट वस्ती असल्याने सील भागातील गल्लीबोळही बंद करण्यात आले आहेत. तसेच कामाव्यतिरिक बाहेर पडणाऱ्या  नागरिकांवर कारवाई केली जात आहे. जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला घेण्यासाठी १० ते १२ यावेळेत नागरिक बाहेर पडतात. पोलिसांच्या भीतीने सध्या तरी सोशल डिस्टनसिंगचे पालन केले जात आहे. नागरिकांनी घराबाहेर येऊ नये. असे आवाहन पोलीस सातत्याने करत आहेत. शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक भाग सील करण्यात आले. परंतु त्यातील बहुतांशी भाग दाटीवाटीचे असल्याने नागरिक काम नसतानाही घराबाहेर येत आहेत. पोलिसांना सहकार्य न करता नागरिकांची मनमानी होत असल्याचे दिसून आले आहे. येरवडा, धानोरी या भागात नियमांचे पालन केले जात आहे. अनेक ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आलाय आहे. त्यामुळे नागरिक गाडी घेऊन फिरू शकत नाहीत. दिवसातून तीन, चार पोलिसांच्या फेऱ्या होत असतात. किराणा मालच्या दुकानातून सोशल डिस्टनसिंगचे पालन होत आहे. परंतु भाजीपाला घेताना गर्दी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. लक्ष्मीनगर येथील झोपडपट्टी भागात कफ्युर्ला कोणीही मनावर घेत नसल्याचे चित्र दिसून आले आहे. याठिकाणी नागरिक विनाकारण घराबाहेर येतात. पोलीस आले की या लोकांमध्ये पळापळ होते. या भागात पोलिसांनी गस्त वाढवणे गरजेचे आहे. असे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे. पर्वती दर्शन भागात दिवसाला एक तरी कोरोना रुग्ण आढळून येत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा दाटीवाटीचा भाग असल्याने घराघरात जाऊन नागरिकांची तपासणी करावी. अशी मागणी या भागातील लोकांनी केली आहे. सध्या तरी सकाळी १० ते १२ ही वेळ सोडून नागरिक बाहेर येत नाहीत. 

* सिंहगड रस्ता आनंद नगर भागात नियमांचे पालन केले जात आहे. या भागातही अनेक ठिकाणी बांबू आणि लोखंडी रॉड बांधून प्रवेश बंद करण्यात आले आहेत. नागरिकही विनाकारण रस्त्यावर येत नाहीत. पोलिसांच्या सुचनेचेही पालन करत असतात.

* इतक्या दिवस नागरिकांनी खुप मनापासून सहकार्य पोलिसना केले आहे. आणखी थोडे दिवस त्यांनी काळजी घ्यावी. महिन्यापासून घरात बसून असल्याने थोडा वैताग येणे साहजिक आहे. मात्र हा त्रास सहन करून त्याकडे दुर्लक्ष केल्यास कोरोनाला हरवणे शक्य आहे. वेळ सर्वांना सहकार्याची आहे हे लक्षात ठेवा. विनाकारण कुणी बेशिस्तपणा करून सगळ्या समाजाला वेठीस धरणार असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. - एक पोलीस कर्मचारी (नाना पेठ).

 

टॅग्स :PuneपुणेYerwadaयेरवडाDhanoriधानोरीSahakar NagarसहकारनगरSwargateस्वारगेट