शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

स्थलांतरांना सामावून घेण्याची क्षमता नसल्याने शहरे बकाल : पाेपटराव पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 16:11 IST

स्थलांतरांना सामावून घेण्याची क्षमता नसल्याने शहरे बकाल हाेत असल्याचे मत आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पाेपटराव पवार यांनी व्यक्त केले.

पुणे : स्थलांतरांना सामावून घेण्याची क्षमता नसल्याने शहरे बकाल हाेत असल्याचे मत आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पाेपटराव पवार यांनी व्यक्त केले. लाेकमतच्या सरपंच अ‍ॅवार्ड साेहळ्याला पवार उपस्थित हाेते, त्यावेळी त्यांनी लाेकमतशी खास संवाद साधला. 

पवार म्हणले, आधुनिक खेड्यांची संकल्पाना गांधीजींनी मांडली हाेती. माेठी जमीन आणि जास्त लाेक हे खेड्यात आहेत हे गांधीजींनी भारत भ्रमणातून ओळखलं हाेतं. खेड्यामध्ये वसलेला भारत हा शेतीप्रधान देश आहे. गावात सुविधा दिल्यास गावातील लाेक शहरांकडे जाणार नाहीत. त्यामुळे शहरे सुरक्षित राहतील आणि गाव स्वयंभू हाेतील. पिण्याचं पाणी, शेतीचे पाणी, रस्ते, वीज, आराेग्य, शिक्षण, सामाजिक सहजीवन यासाठी आपण स्वातंत्र्याचं झेंडावंदन गेली 72 वर्षे करत आहाेत. आज जर शहरांच आणि गावांच चित्र पाहिलं तर शहरांमध्ये बकालपणा वाढताेय. शहरांची स्तलांतरीतांंना सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. तर दुसरीकडे गावं ओस पडत आहेत. गावांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम आराेग्य, शेतीला पाणी, दळवळणाची साधना यांना अभाव असल्याने लाेक गावातून शहरांमध्ये स्तलांतर करतात. राेजगाराच्या तसेच शिक्षणाच्या संधी शहराकडे गेल्या आहेत. गावांचे माेठ्याप्रमाणावर शहरीकरण हाेत आहे. तसेच शहरांचं विस्तारिकरण हाेऊन गावं शहरात जात आहेत. 

हिवरे बाजारने सर्व सुविधा गावात दिल्या. त्यामुळे शहराकडे गेलेली कुटुंब गावांकडे परत आली. गावांमध्ये याेजना कार्यक्षमपणे राबविणे गरजेचे आहे. असे झाल्यास लाेक गावांकडून शहराकडे जाणार नाहीत आणि शहराकडे जाणारे लाेंढे थांबविता येतील. यासाठी पंचायत राजव्यवस्थेचं वर्गीकरण करण्याची गरज आहे. प्रत्येक गावाची समस्याही वेगळी आहे. शहरीकरण झपाट्याने हाेणाऱ्या पंचायतींना वेगळा दर्जा देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Puneपुणेsarpanchसरपंच