शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

स्थलांतरांना सामावून घेण्याची क्षमता नसल्याने शहरे बकाल : पाेपटराव पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 16:11 IST

स्थलांतरांना सामावून घेण्याची क्षमता नसल्याने शहरे बकाल हाेत असल्याचे मत आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पाेपटराव पवार यांनी व्यक्त केले.

पुणे : स्थलांतरांना सामावून घेण्याची क्षमता नसल्याने शहरे बकाल हाेत असल्याचे मत आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पाेपटराव पवार यांनी व्यक्त केले. लाेकमतच्या सरपंच अ‍ॅवार्ड साेहळ्याला पवार उपस्थित हाेते, त्यावेळी त्यांनी लाेकमतशी खास संवाद साधला. 

पवार म्हणले, आधुनिक खेड्यांची संकल्पाना गांधीजींनी मांडली हाेती. माेठी जमीन आणि जास्त लाेक हे खेड्यात आहेत हे गांधीजींनी भारत भ्रमणातून ओळखलं हाेतं. खेड्यामध्ये वसलेला भारत हा शेतीप्रधान देश आहे. गावात सुविधा दिल्यास गावातील लाेक शहरांकडे जाणार नाहीत. त्यामुळे शहरे सुरक्षित राहतील आणि गाव स्वयंभू हाेतील. पिण्याचं पाणी, शेतीचे पाणी, रस्ते, वीज, आराेग्य, शिक्षण, सामाजिक सहजीवन यासाठी आपण स्वातंत्र्याचं झेंडावंदन गेली 72 वर्षे करत आहाेत. आज जर शहरांच आणि गावांच चित्र पाहिलं तर शहरांमध्ये बकालपणा वाढताेय. शहरांची स्तलांतरीतांंना सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. तर दुसरीकडे गावं ओस पडत आहेत. गावांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम आराेग्य, शेतीला पाणी, दळवळणाची साधना यांना अभाव असल्याने लाेक गावातून शहरांमध्ये स्तलांतर करतात. राेजगाराच्या तसेच शिक्षणाच्या संधी शहराकडे गेल्या आहेत. गावांचे माेठ्याप्रमाणावर शहरीकरण हाेत आहे. तसेच शहरांचं विस्तारिकरण हाेऊन गावं शहरात जात आहेत. 

हिवरे बाजारने सर्व सुविधा गावात दिल्या. त्यामुळे शहराकडे गेलेली कुटुंब गावांकडे परत आली. गावांमध्ये याेजना कार्यक्षमपणे राबविणे गरजेचे आहे. असे झाल्यास लाेक गावांकडून शहराकडे जाणार नाहीत आणि शहराकडे जाणारे लाेंढे थांबविता येतील. यासाठी पंचायत राजव्यवस्थेचं वर्गीकरण करण्याची गरज आहे. प्रत्येक गावाची समस्याही वेगळी आहे. शहरीकरण झपाट्याने हाेणाऱ्या पंचायतींना वेगळा दर्जा देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Puneपुणेsarpanchसरपंच