शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुण्यातील या चाैकात पाेलीसांसमाेरच वाजवले जातात वाहतुकीचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:18 IST

पुण्यातील विश्रांतवाडी चाैकात वाहनचालकांकडून सर्रास नियम माेडले जात असताना वाहतूक पाेलीसांकडून फारशी कारवाई हाेत नसल्याचे चित्र अाहे. त्यामुळे या भागातील वाहतूकीची समस्या जटील झाली अाहे.

ठळक मुद्देवाहतूकीला नाही शिस्तनियम माेडले जात असताना पाेलीस घेतात बघ्याची भूमिका

पुणे :  पुणे तिथे काय उने असे म्हंटले जाते. सगळ्या गाेष्टींमध्ये पुणेकर नेहमीच अाघाडीवर असतात. तसेच अाता वाहतुकीचे नियम माेडण्यातही पुणेकर अाघाडीवर असल्याचे चित्र अाहे. पुण्यातील विश्रांतवाडी भागातील मुंकदराव अांबेडकर चाैकात तर वाहतूक पाेलीसांसमाेरच नियम माेडण्यात येत असून पाेलीसांकडून फारशी कारवाई हाेत नसल्याने या चाैकात वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचे चित्र अाहे.     पुण्याच्या लाेकसंख्येपेक्षा पुण्यातील वाहनांची संख्या अधिक झाली अाहे. त्यात दरराेज शेकडाे नव्या वाहनांची भर पडत अाहे. सकाळच्या तसेच संध्याकाळच्या वेळी शहरातील विविध भागात माेठी वाहतूक काेंडी पाहायला मिळते. वाहतूक पाेलीसांकडून वाहनचालकांनी नियम पाळावेत यासाठी सातत्याने जनजागृती करण्यात येते. परंतु तरीही वाहतूकीचे नियम माेठ्याप्रमाणावर ताेडले जात अाहेेत. विश्रांतवाडीतील मुख्य चाैकात तर नेहमीच नियम सर्रास ताेडले जातात. या ठिकाणचे सिग्नल हे फक्त शाेभेसाठी अाहेत की काय असाच प्रश्न अाता निर्माण हाेत अाहे. त्यातही वाहतूक पाेलीसांनी या ठिकाणची वाहतूक सुरळीत करणे तसेच वाहनचालकांना शिस्त लावणे अपेक्षित असताना, त्यांच्याकडूनही नियम माेडणाऱ्यांकडे कानाडाेळा केला जात असल्याने वाहनचालकांना नियम माेडण्यात कुठलिही चूक असल्याचे वाटत नाही. या चाैकात केव्हाही पाहिलं तरी वाहनचालक झ्रेब्रा क्राॅसिंगच्या पुढेच थांबलेले असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता अाेलांडणे अवघड जाते. त्यातही सिग्नल माेडण्याचे प्रमाणही याठिकाणी माेठे अाहे. 

    मुकुंदराव अांबेडकर चाैकात अनेक रस्ते एकत्र येतात. धानाेरी, एअरपाेर्ट, पुण्याकडून येणारा रस्ता, तसेच अाळंदी कडून पुण्याला जाणारा रस्ता हे सर्व रस्ते या चाैकात एकत्र येतात. या सर्व भागातून पुण्याकडे जाण्यासाठी या चाैकात यावे लागते. त्यामुळे माेठी वाहतूक या भागातून हाेत असते. सकाळी तसेत संध्याकाळच्यावेळी तर माेठी वाहतूक काेंडी या भागात हाेत असते. या सर्व रस्त्यांवरुन येणारे वाहनचालक हे सिग्नल सुटण्याअाधीच पुढे येऊन थांबतात. त्यामुळे ज्यांचा सिग्नल सुटला अाहे त्यांना पुढे जाणे अवघड हाेते. अनेकदा तर निर्भिडपणे सिग्नल ताेडला जाताे. त्याचबराेबर येथील बिग बाजारच्या समाेर संघ्याकाळच्यावेळी अनधिकृत पार्किंग केले जाते. त्यामुळे सुद्धा माेठी वाहतूक काेंडी हाेत असते. परंतु वाहतूक पाेलीसांकडून कारवाई हाेत नसल्याने वाहनचालक निर्भीड झाले अाहेत.. धानाेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनधिकृतपणे रिक्षांमधून प्रवाशांची वाहतूक केली जाते. या ठिकाणच्या मंदिर व विहारामुळे अाधीच हा रस्ता वाहतूकीसाठी फार कमी उरताे. त्यातही हे रिक्षाचालक रस्त्यातच थांबून प्रवासी घेत असल्याने वाहतूककाेंडीत भर पडत असते. या रिक्षांमधून केवळ तीन प्रवाशींची वाहतूक करणे अपेक्षित असताना 10 प्रवाशांची अनधिकृत वाहतूक केली जाते. त्यातही अनेक रिक्षांचे हेडलाईट बंद असतात तसेच काही रिक्षांना नंबर प्लेट सुद्धा नाहीत. हे सर्व वाहतूक पाेलीसांच्या समाेर चालू असताना पाेलीसांकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येते. अांबेडकर जयंती निमित्त विविध मंडळांकडून तयार करण्यात अालेले रथही याच चाैकात ठेवण्यात अाले असून त्यांच्यावरही कुठलिच कारवाई हाेत नसल्याचे चित्र अाहे. 

    याबाबत विश्रांतवाडी वाहतूक विभागाचे सहायक पाेलिस निरिक्षक सी.व्ही. केंन्द्रे यांच्याशी फाेनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.   

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसVishrantwadiविश्रांतवाडी